शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘अग्निशमन’च्या जागेवर बीओटीचा घाट

By admin | Updated: November 27, 2015 00:06 IST

महापालिका : वर्कशॉप व रुग्णालय शंभर फुटी रस्त्यावरील आरक्षित जागेवर हलविणार

सांगली : महापालिका मुख्यालयालगतच्या प्रतापसिंह उद्यानाजवळील अग्निशमन दलाचे कार्यालय व यांत्रिक विभाग स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या जागेवर बीओटीतून व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घातल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. यापूर्वीही या जागेवर बीओटीचा प्रस्ताव आला होता, पण विरोधामुळे तो बारगळला होता.महापालिकेच्या स्थायी समिती सभेत गुरुवारी अग्निशमन दल व यांत्रिक विभाग इतरत्र हलविण्यावर चर्चा झाली. काँग्रेसचे नगरसेवक हारूण शिकलगार व स्वाभिमानी आघाडीच्या अश्विनी खंडागळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. प्रतापसिंह उद्यानालगतच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. मुख्य शहरात आगीच्या घटना घडल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी तत्कालीन सांगली नगरपालिकेने या जागेवर अग्निशमन दलाचे कार्यालय सुरू केले आहे. यालगतच महापालिकेचा यांत्रिक विभागही आहे. पालिकेची वाहने दुरुस्तीचे कामही तेथून चालते. अग्निशमन दलासाठी ही जागा अपुरी आहे. शंभरफुटी रस्त्यावरील कत्तलखाना परिसरात महापालिकेने अग्निशमन दल व यांत्रिक विभागासाठी दोन एकर जागा आरक्षित केली आहे. ही जागा विकसित करून दोन्ही हे विभाग तेथे स्थलांतरित करावेत, अशी मागणी शिकलगार व खंडागळे यांनी केली. या जागेची पाहणी करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा मोकळी करण्यात येणार आहे. त्यामागे सत्ताधाऱ्यांचा बीओटीचा घाट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृह, जयश्री टॉकीजजवळील पार्किंगची जागा या दोन्ही ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच महासभेत त्याला मान्यताही घेतली जाईल. या दोन्ही जागांसोबतच अग्निशमन दलाच्या जागेचाही त्यात समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सात ते आठ वर्षापूर्वी शहरात चार ठिकाणी बीओटी प्रकल्प झाले. तेव्हाही या जागेत बीओटीचा विचार झाला होता. पण बीओटीचे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने या जागेवरील प्रस्ताव मागे पडला होता. आता पुन्हा अग्निशमन दलाच्या जागेवर बीओटीची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)उत्पन्नाचा स्त्रोत : वादात अडकलेलाउत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्याचा विचार पुढे आला की बीओटीचा विषय हमखास चर्चेला येतो. यापूर्वी सांगली, मिरजेतील अनेक जागा, इमारती बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात आल्या. उत्पन्नवाढीच्या चर्चेपेक्षा यातील बेकायदेशीर गोष्टी आणि खाबुगिरीच्या कहाण्याच अधिक चर्चेत आल्या. त्यामुळे उत्पन्नाचा हा स्त्रोत वादात अडकलेला आहे. आॅडिटमध्ये फसलेले प्रकल्प....महापालिका क्षेत्रात झालेल्या बीओटी प्रकल्पांवर विशेष लेखापरीक्षणातही ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे भविष्यातील प्रकल्प कोणत्या पद्धतीने करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.