शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पुन्हा एकदा बीओटीचा मोह!

By admin | Updated: April 8, 2016 23:57 IST

सत्ताधाऱ्यांचा डाव : मोक्याच्या भूखंडांचे श्रीखंड लाटणार

शीतल पाटील -- सांगलीमहापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने पुन्हा एकदा बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याचा घाट घातला आहे. काँग्रेसने केलेल्या यापूर्वीच्या बीओटीवर लेखापरीक्षकांपासून ते उच्च न्यायालयापर्यंत ताशेरे ओढले गेले आहेत. तरीही बीओटीचा मोह काहीकेल्या सुटलेला दिसत नाही. दहा वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताकाळात शहरातील मोक्याच्या जागा विकसकाच्या घश्यात घालण्यात आल्या. अगदी कवडीमोल किमतीने या जागांचा बाजार झाला. महासभेतील गोंधळाचा फायदा घेत ऐनवेळी बीओटीचा ठराव करण्यात आला. नंतर गाळ्याची विक्री होत नसल्याचे कारण देत या जागांची मालकी विकसकाच्या हातात सोपविण्यात आली. याविरोधात वि. द. बर्वे व इतरांनी शासनाकडे तक्रारी केल्या. महापालिकेच्या कारभाराचे विशेष लेखापरीक्षण झाले. त्यात बीओटीवर ताशेरे ओढले गेले. अगदी उच्च न्यायालयात खटले दाखल झाले. न्यायालयानेही बीओटीवर शासनालाच धारेवर धरले आहे. बीओटीतून महापालिकेच्या हाती काय पडले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण दिले जात असताना, या बीओटीतून पालिकेच्या तिजोरीत किती कर जमा होतो, याचा हिशेब जरी घातला तरी, बीओटीतून फारसे काहीच हाती पडल्याचे दिसून येणार नाही. काँग्रेसच्या वाट्याला यापूर्वीच्या बीओटीतून मोठी बदनामी आली आहे. तरीही त्यातून काही शहाणपण त्यांना आलेले दिसत नाही. उलट बीओटीचा मोह अजूनही सुटलेला नाही. आता विद्यमान महापौर हारूण शिकलगार यांनी दहा जागा बीओटीतून विकसित करण्याची घोषणा केली आहे. या जागांचाही बाजार होणार नाही, याची हमी महापौरांना द्यावी लागेल. आतापर्यंतचा अनुभव पाहता विकसक व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे बीओटीतून कोटकल्याण झाले आहे. आताही तोच प्रकार होणार असेल तर नागरिकांनाच उठाव करावा लागेल. मोक्याच्या भूखंडांची विक्री करून स्वत:ची तुंबडी भरण्याच्या वृत्तीमुळे बीओटी पुरती बदनाम झाली आहे. सध्या तरी पूर्वीसारखा गुपचूप कारभार सुरू आहे.पार्किंगचे काय? : समस्या आणखी बिकटसांगलीतील अतिथीगृह, प्रसुतीगृह, शिवाजी मंडई, जुनी भाजी मंडई, गोकुळ नाट्यगृह या मुख्य बाजारपेठेतील जागा बीओटीतून विकसित करण्यात येणार आहेत. सध्या बाजारपेठेत सर्वात मोठी समस्या पार्किंगची आहे. त्यात मंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल कमी झाली आहे. अशा स्थितीत महापालिकेने व्यापारी संकुले उभारली तर पार्किंगचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. पण त्याचा विचार विद्यमान सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. केवळ बीओटीतून स्वकल्याण साधण्याचा त्यांचा डाव असल्याची टीकाही होऊ लागली आहे.कोण, काय म्हणाले?शहरातील मोक्याच्या जागा लाटण्याचा हा उद्योग आहे. यापूर्वीच्या बीओटीवर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. यातून काहीच शहाणपण कारभाऱ्यांनी घेतल्याचे दिसत नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आता तरी पालिका कारभारात लक्ष घालून जागा वाचवाव्यात. - वि. द. बर्वेनागरिक हक्क संघटनाबीओटीतून जागा विकसित करताना पारदर्शकपणा हवा. सत्ताधाऱ्यांनी दहा जागा बीओटीतून विकसित करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्याचा प्रस्ताव कसा येतो, त्यावर आमची भूमिका ठरेल. छुप्या पद्धतीने जागा लाटण्याचा उद्योग असेल तर आम्ही विरोध करू. - गौतम पवारनगरसेवक, स्वाभिमानी