शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाविना जिल्ह्यातला बेंदूर कोरडाच!

By admin | Updated: July 30, 2015 00:24 IST

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण : सण आणि निसर्गाचे गणित बिघडल्याचे चित्र...

सहदेव खोत -पुनवत -बेंदूर सण म्हणजे सर्वत्र पाऊस, हे परंपरागत समीकरण. या सणावेळी सर्वत्र नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत असतात. ग्रामीण भागात तर या सणाच्यानिमित्ताने आनंदाला उधाण आलेले असते. परंतु यावर्षी जिकडे-तिकडे कडक ऊन अन् कोरडी ठणठणीत शेती, यामुळे शेतकऱ्यांच्या या सणाच्या आनंदावर यावर्षी जणू विरजणंच पडले आहे. बैलांना नदीवरून धुऊन आणणे, त्यांना सजवणे, वर्षाचे अन्न देणाऱ्या काळ्या आईला (शेतीला) चिखलवाटा तुडवीत पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणे, शेतात पिंपळाच्या पानांचे तोरण वाहणे, असे बरेच काही या सणाला असते. पण यंदाच्या बेंदरात पाऊस नसल्याने, तसे आनंददायी चित्र पाहायला मिळालेच नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात बेंदूर सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भर पावसाळ्यात बेंदराचा सण येतो. दरवर्षी बेंदराला धुवाँधार पाऊस असतो. नद्यांना हमखास पूर येतो. ग्रामीण भागात या पुराला बेंदरी पूर म्हणतात. अर्थात पुराने हानी होत असली तरी, या बेंदरी पुरामुळे अनेकांचे काही फायदेही होत असतात. शेती पिकविण्यास शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सर्ज्या-राज्याच्या जोडीला अंघोळ घालून छान सजवलं जातं. त्यांना अंबील, घुगऱ्या, हुंडे, नैवेद्य खायला घातला जातो. शेतकरी या दिवशी आपल्या बैलांप्रती व शेताप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.मात्र यावर्षी बेंदूर सण व पाऊस यांचे गणितच बिघडल्याने शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना या सणाचा आनंदच घेता आला नाही. ना शेतात पाणी ना चिखल, ना नदी-नाल्यांना पूर. या परिस्थितीमुळे बेंदूर सणातील उत्साहच यंदा निघून गेला. एकंदरीत बदलत्या काळात बेंदूर आणि पाऊस यांचे समीकरण बिघडल्याने या सणातला नेहमीचा आनंदच हरविला आहे.