शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

हुतात्मा कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:02 IST

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्राची धोरणे, आयकरामुळे ऊसदराला वेसण  : वैभव नायकवडीहुतात्मा साखर कामगारांकडून एक कोटीची गाडीशासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरूप्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन

वाळवा : केंद्र सरकारने आठ लाख टन साखर आयात केली नसती, तसेच कारखान्यांवर साखर साठ्याबाबत बंधने लादली नसती, तर ‘हुतात्मा’ला आणखी दर देणे शक्य झाले असते. साखर उद्योगावरील आयकरही जादा दरासाठी अडचणीचा ठरत आहे, असे प्रतिपादन हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत नायकवडी बोलत होते.

यावेळी कुसुमताई नायकवडी, वंदना माने, विशाखा कदम, महादेव कांबळे, महमद चाऊस, किरण नायकवडी, नंदिनी नायकवडी, वीरधवल नायकवडी, प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नायकवडी म्हणाले, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याच्या प्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यात येईल.

प्रा. बाळासाहेब नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी हे भविष्याचे वेध घेणारे अत्यंत वैचारीक व वैज्ञानिक कसोटीवरील चिकित्सक नेतृत्व आहे. हुतात्माच्या माध्यमातून इथेनॉल प्रकल्प उभारून तो कार्यान्वित करण्यापूर्वीच कर्जमुक्त करणे, हे केवळ वैभव नायकवडी यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे.

कामगारांकडून एक कोटीची गाडीयावेळी हुतात्मा साखर कामगारांतर्फे वैभव नायकवडी यांना एक कोटी रूपये किमतीची आलिशान मोटार भेट देण्यात आली. कुसुमताई नायकवडी यांनी गाडीच्या चाव्या वैभव नायकवडींकडे सोपविल्या. यावेळी कुसुमताई म्हणाल्या, गरीब, कष्टकरी दैवत मानून हुतात्मा कारखाना उभा केला आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर, कामगारांना वेतन व बोनस नियमितपणे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावला.त्यांना विश्वास दिला. या विश्वासाचे प्रतिक म्हणून कामगरांनी वैभवला गाडी प्रदान  केली आहे. यापुढेही हा विश्वास कायम राहावा. ‘टीम वर्क’च्या माध्यमातून कारखान्याच्या, पर्यायाने शेतकरी, कष्टकºयांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे