शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

हुतात्मा कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:02 IST

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्राची धोरणे, आयकरामुळे ऊसदराला वेसण  : वैभव नायकवडीहुतात्मा साखर कामगारांकडून एक कोटीची गाडीशासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरूप्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन

वाळवा : केंद्र सरकारने आठ लाख टन साखर आयात केली नसती, तसेच कारखान्यांवर साखर साठ्याबाबत बंधने लादली नसती, तर ‘हुतात्मा’ला आणखी दर देणे शक्य झाले असते. साखर उद्योगावरील आयकरही जादा दरासाठी अडचणीचा ठरत आहे, असे प्रतिपादन हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत नायकवडी बोलत होते.

यावेळी कुसुमताई नायकवडी, वंदना माने, विशाखा कदम, महादेव कांबळे, महमद चाऊस, किरण नायकवडी, नंदिनी नायकवडी, वीरधवल नायकवडी, प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नायकवडी म्हणाले, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याच्या प्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यात येईल.

प्रा. बाळासाहेब नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी हे भविष्याचे वेध घेणारे अत्यंत वैचारीक व वैज्ञानिक कसोटीवरील चिकित्सक नेतृत्व आहे. हुतात्माच्या माध्यमातून इथेनॉल प्रकल्प उभारून तो कार्यान्वित करण्यापूर्वीच कर्जमुक्त करणे, हे केवळ वैभव नायकवडी यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे.

कामगारांकडून एक कोटीची गाडीयावेळी हुतात्मा साखर कामगारांतर्फे वैभव नायकवडी यांना एक कोटी रूपये किमतीची आलिशान मोटार भेट देण्यात आली. कुसुमताई नायकवडी यांनी गाडीच्या चाव्या वैभव नायकवडींकडे सोपविल्या. यावेळी कुसुमताई म्हणाल्या, गरीब, कष्टकरी दैवत मानून हुतात्मा कारखाना उभा केला आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर, कामगारांना वेतन व बोनस नियमितपणे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावला.त्यांना विश्वास दिला. या विश्वासाचे प्रतिक म्हणून कामगरांनी वैभवला गाडी प्रदान  केली आहे. यापुढेही हा विश्वास कायम राहावा. ‘टीम वर्क’च्या माध्यमातून कारखान्याच्या, पर्यायाने शेतकरी, कष्टकºयांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे