शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

बोगस कीटकनाशकांचा विषारी विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 13:26 IST

अत्यंत विषारी कीटकनाशक तयार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ लोकांची समिती गठित केली असून, तिच्या मंजुरीनंतरच कीटकनाशक विक्रीसाठी परवाना देण्यात येतो. या परवान्याची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी परवाना न घेताच काही कंपन्या अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करीत आहेत. बोगस कंपन्यांची हीच नफेखोरी शेतकºयांच्या जिवावर बेतत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या जिवाशी खेळ नफेखोरीसाठी शासनाची मान्यता न घेताच औषधांची विक्रीकृषी विभागाची बघ्याची भूमिका

अशोक डोंबाळे 

सांगली,9 : अत्यंत विषारी कीटकनाशक तयार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ लोकांची समिती गठित केली असून, तिच्या मंजुरीनंतरच कीटकनाशक विक्रीसाठी परवाना देण्यात येतो. या परवान्याची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी परवाना न घेताच काही कंपन्या अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करीत आहेत. बोगस कंपन्यांची हीच नफेखोरी शेतकºयांच्या जिवावर बेतत आहे.

कीटकनाशकाचे प्रमुख्याने अत्यंत विषारी, फार विषारी, साधारण विषारी आणि किंचित विषारी असे चार प्रकार आहेत. ही कीटकनाशके विक्रीसाठी पाठविताना किमान दीड ते तीन वर्षे त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात. या कीटकनाशकांना मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ जाणकारांचे कृषी विभागाचे बोर्ड तयार केले आहे. यामध्ये कृषी शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, शेतकरी, लोकप्रतिनिधी, औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

कोणत्याही कंपनीने औषध तयार केल्यानंतर केंद्रीय समितीपुढे ते कीटकनाशक शेतकºयांच्या आरोग्यासाठी घातक नाही ना, औषध फवारणी करतानाशेतकºयांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्या औषधामध्ये कोणते घटक आहेत, याची सर्व माहिती औषधाच्या बाटलीवर लावणे संबंधित कंपन्यांना बंधनकारक केले आहे.

अत्यंत विषारी कीटकनाशक तयार करण्यासाठी एका कंपनीला किमान तीन वर्षे संशोधन करावे लागते. जवळपास तीन कोटी रुपयांचा खर्च येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी आणि केंद्रीय बोर्डाची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी काही कंपन्या अत्यंत विषारी औषधांची निर्मिती करून ती शेतकºयांच्या माथी मारत आहेत. औषध दुकानदारांना भरमसाट कमिशन देऊन ते शेतकºयांच्या माथी मारत आहेत. औषध फवारणी करणाºयांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच.

यापेक्षाही ज्या पिकांवर फवारणी केली जाते, ती पिके, फळे, भाजीपाला खाण्यासही अपायकारक आहे. याची कृषी विभागाच्या सर्वच अधिकाºयांना जाण आहे. तरीही ते जाणीवपूर्वक या अत्यंत विषारी कीटकनाशकांच्या बोगस कंपन्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी केला आहे. याप्रमाणेच काही पर्यावरणप्रेमी शेतकºयांचाही आरोप आहे.कीटकनाशक कायद्याची अंमलबजावणीच नाही

राज्यात कीटकनाशक कायदा-१९६८ व कीटकनाशक नियम-१९७१ मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. नफाखोरीसाठी कंपन्या शेतकºयांच्या जिवाशी खेळत असून, त्यांना शासन व अधिकाºयांचे अभय आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी केला आहे.

मे-१९५८ मध्ये केरळ व चेन्नई येथे दोषपूर्ण कीटकनाशकांमुळे शेकडो शेतकºयांचे बळी गेले होते. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन समितीने कीटकनाशकांचे उत्पादन, वितरण, विक्री व उपयोगाचे नियमन करण्यासाठी कायदा तयार करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार देशात २ सप्टेंबर १९६८ पासून कीटकनाशक कायदा लागू करण्यात आला आहे. कायद्यातील कलम ३६ अ नुसार कीटकनाशके वापरासंदर्भात नियम तयार करून ते १९७१ पासून लागू करण्यात आले.

कायदा व नियमानुसार शेतकºयांना कीटकनाशक वापरासंदर्भात प्रशिक्षण देणे, कीटकनाशकांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करणारे कपडे देणे व कीटकनाशकांपासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

फवारणी करताना शेतकºयांनी घ्यावयाची काळजी...

  1. फुगलेले, गळके, फाटके डबे, बाटल्यांतील कीटकनाशके खरेदी करू नका
  2. मुदतीत असल्याची खात्री करा
  3. फवारणी करताना पूर्ण शरीर झाकून घ्यावे, हातमोजे, बूट, गॉगल, मास्कचा वापर करा
  4. दुपारच्या उन्हामध्ये किंवा वादळी वारा असताना विरुध्द दिशेला फवारणी करू नये
  5. प्रमाणित व मान्यताप्राप्त कंपनीचेच कीटकनाशक खरेदी करा
  6. बादली व इतर औषध तयार करताना वापरलेली