शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

राज्य सरकारच्या निषेधार्थ ‘स्वाभिमानी’चा शुक्रवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

इस्लामपूर : राज्यातील घरगुती आणि शेती पंपाची वीज बिले थकलेली असली तरी वीज कनेक्शन तोडली जाणार नाहीत, असे आश्वासन ...

इस्लामपूर : राज्यातील घरगुती आणि शेती पंपाची वीज बिले थकलेली असली तरी वीज कनेक्शन तोडली जाणार नाहीत, असे आश्वासन देत घुमजाव करणाऱ्या राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १९ मार्च रोजी संपूर्ण राज्यभरात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी दिली.

कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याचे, तसेच कनेक्शन न तोडण्याचे वचन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र, शेवटच्या दिवशी सरकारने घुमजाव करीत थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचाच आदेश दिला, हे निषेधार्ह आहे. लॉकडाऊनमुळे सगळीकडेच बेरोजगारी पसरली. शेतकरी वर्ग तर पूर्ण उद्ध्वस्त झाला. त्यामुळे या वीज जोडणी तोडण्याला कडाडून विरोध केला जाणार आहे.