शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पाण्यावर काळ्या खणीचा मंत्र

By admin | Updated: July 14, 2016 00:22 IST

प्रस्ताव धूळ खात : प्रमोद चौगुलेंचा आराखडा

सांगली : पावसाळी पाणी निचरा होत नसल्याने सांगली शहराचे जनजीवन गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. तात्पुरत्या उपाययोजना आणि प्रशासकीय हतबलतेमुळे दरवर्षी या प्रश्नाचे स्वरूप अधिक गंभीर होत आहे. काही वर्षांपूर्वी सांगलीचे वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी पाणी निचऱ्यावर काळ्या खणीचा मंत्र सांगणारा आराखडा सादर केला होता. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आता पावले उचलणे गरजेचे आहे. सांगली शहरातील ९० टक्के भाग सध्या जलमय बनला आहे. शहरातील रस्ते, खुले भूखंड, क्रीडांगणे, प्लॉट अशा सर्वच ठिकाणी तलाव साचले आहेत. याशिवाय पाणी साचून राहिल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. ड्रेनेजचे पाणीही रस्त्यांवर येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व गटारी, नालेसफाईची मोहीम आणि पाणी साचल्यानंतर विविध भागांची पाहणी करण्याची औपचारिकता यातच महापालिका, त्याठिकाणचे पदाधिकारी आणि नगरसेवक धन्यता मानत आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनेच्या दृष्टीने कुणीच पावले उचलताना दिसत नाहीत. सांगलीचे प्रमोद चौगुले यांनी दिलेल्या पावसाळी पाणी निचऱ्याचा प्रकल्प सहज शक्य असताना त्याकडे आजवर कुणीही पाहिले नाही. नकारात्मक भूमिकेतून प्रत्येक योजनेकडे आणि प्रकल्पाकडे पाहिल्याने सांगली राज्याला कोणताही आदर्श देऊ शकत नाही. मिरजेच्या हैदरखान विहिरीने केलेली क्रांती सांगलीच्या काळ्या खणीतूनही साकारली जाऊ शकते, मात्र त्याकडे गांभीर्याने कुणीही पाहिलेले नाही. सांगलीच्या काळ्या खणीतील पाण्याची पातळी कधीही कमी-जास्त होताना दिसत नाही. नैसर्गिक झऱ्यांनी युक्त असलेली ही काळी खण १७ एकर इतकी मोठी आहे. याठिकाणी केवळ पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा जोडली, तर सांगलीच्या गावठाणातील महत्त्वाच्या चौकांमधील आणि रस्त्यांवरील पाणी साठण्याचा प्रश्न सुटू शकतो. (प्रतिनिधी)