शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

युती तोडण्याचे पाप भाजपच्या तीन नेत्यांचेच : आदित्य ठाकरे

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

२५ वर्षांची युती तोडण्याचे पाप शिवसेनेने केले नाही

विटा : गेल्या २५ वर्षांची युती तोडण्याचे पाप शिवसेनेने केले नाही, तर ते पाप भाजपच्या तीन नेत्यांचे असल्याचा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवारी) येथे केला. शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अभिनेते आदेश बांदेकर, अनिल बाबर, उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे, संजय विभुते, जि. प. सदस्य फिरोज शेख, विनोद गुळवणी उपस्थित होते. सभेनंतर बाबर यांनी विटा शहरातून रॅली काढली.ठाकरे म्हणाले की, संपूर्ण राज्यात भगवे वादळ आहे. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट सर्वत्र पोहोचले आहे. भाजपला शिवसेनेची गरज नसल्याचे वाटत आहे. मात्र, सेनेच्या ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दिल्ली व भाजपसमोर झुकले नाहीत. झुकले ते फक्त जनतेसमोरच. राज्यात शिवशाही आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लावू.बाबर म्हणाले की, दुष्काळी जनतेला टेंभूचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष केला. टेंभू पूर्ण करून पाणी देण्याची ग्वाही उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतरच मी पक्षांतर केले आहे. रवींद्र कदम, शंकर मोहिते, श्रीरंग पवार, संजय भिंगारदेवे, निवास पाटील, प्रताप पाटील, बाळासाहेब लकडे, सयाजीराव बाबर, शरद शहा, शेखर भिंगारदेवे, गणेश निकम, मनोज भगत उपस्थित होते. (वार्ताहर)