शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पदवीधरमधील मक्तेदारी मोडीत काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फारकाळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस ...

ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आपण मतदारांना फारकाळ फसवू शकत नाही, हा संदेशही या निवडणुकीत भाजपला मतदारांनी दिला आहे. बोगस घोषणांनाही जनता कंटाळल्याचे राज्यातील सर्वच जागांच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मक्तेदारी असल्याच्या अविर्भावात भाजपचे नेते होते. त्यांना मतदार आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने जागा दाखविली. कुणी काहीही म्हणोत, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन मतदान करून घेतले. प्रत्येकाने विजय खेचून आणायचाच, या जिद्दीने काम केले. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावपातळीवरील कार्यकर्त्यालाही कामाला लावले. प्रचारात आणि मतदान नोंदणीपासून ते करून घेण्यापर्यंत चांगले नियोजन केले होते. म्हणूनच पहिल्या फेरीमध्येच मताधिक्य घेऊन विजय मिळवून प्रस्थापित भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. यापुढील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे नियोजन असणार आहे. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन अटळ असेल, असा विश्वासही अरुण लाड यांनी व्यक्त केला.

चौकट

फारकाळ जनतेला फसविता येत नाही

भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत बोगस घोषणा केल्या आहेत. केंद्राच्या जाचक नियमांमुळे उद्योजक अडचणीत असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. हमीभाव कागदावरच असून, तो शेतकऱ्यांना कधीच मिळाला नाही. बेरोजगारी दिवसाला वाढत असून, भांडवलदार गलेलठ्ठ होत आहेत. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. जनतेला फसवून फारकाळ सत्ता मिळविता येत नाही, असा संदेशच पदवीधरच्या निवडणुकीतून मतदारांनी दिला आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.