शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भाजपचे सरकार असंवेदनशील

By admin | Updated: October 17, 2016 00:39 IST

अजित पवार : मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका

सांगली : भाजपच्या सत्ताकाळात राज्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे. समाजातील कुठलाच घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. शेतकरी, व्यापारी, शिक्षक, तरूणांमध्ये असंतोष आहे. राज्यातील मंत्री वेगवेगळी व्यक्तव्ये करून समाजात उद्रेक करीत आहेत. राज्यातील भाजपचे सरकार असंवेदनशील बनले असून, अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगलीत केली. काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अजित पवार सांगलीत आले होते. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, युतीतील घटकपक्ष असलेली शिवसेना शिक्षकांच्या बाजूने मोर्चा काढते, तर औरंगाबादमध्ये याच शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार केला जातो. मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या चुकीच्या व्यक्तव्यामुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली. ऊठसूट कोणता ना कोणता मंत्री राजीनाम्याचा इशारा देत आहे. त्यांच्याच पक्षाचे लोक पोलिसांवर दगडफेक करीत आहेत. भाजपात गुंडांना प्रवेश दिला जात असून या गुंडांच्या स्वागताला मंत्री उपस्थित राहत आहेत. एकूणच राज्यातील वातावरण अस्वस्थ झाले असून, ते निवळण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत साऱ्यांनीच खबरदारी घ्यायला हवी. पण तसे घडताना दिसत नाही. उलट मंत्रीच उलटसुलट व्यक्तव्ये करून असंतोष वाढवित आहेत. मराठा आरक्षणाबाबत पवार म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. गेल्या दोन वर्षात भाजप सरकार मराठा आरक्षणावर गप्पच होते. आता लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाल्यावर सरकारला जाग आली आहे. भाजपच्या कार्यकारिणीत आरक्षणाचा ठराव केला जातो. पण त्याची गरजच काय? मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करायला हवी. केंद्रात व राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत आहे. मराठा आरक्षण मंजुरीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत लागली, तर आम्ही देण्यास तयार आहोत, असे सांगून, मराठा समाजाचे मोर्चे कुणाच्याही विरोधात नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर ते म्हणाले की, घोटाळ्याप्रश्नी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. राज्यातील औषध खरेदी योग्यरित्या झाली नसल्याचे नुकतेच उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्यातील कुपोषण रोखण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळ जाहीर करण्यासही विलंब लावला. चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत, काय उपाययोजना केल्या, याची माहिती मागविली. तेव्हा सरकारला जाग आली. अशा अनेक प्रकरणात उच्च न्यायालयाने सरकारचे कान टोचण्याचे काम केले आहे. उलट सरकारची भूमिका टाळाटाळ करण्याचीच राहिल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी) आठ लाख कोटी कुठे गुंतविले? ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याच्या जाहिराती सरकारकडून सुरू आहेत. नेमकी ही गुंतवणूक कुठे केली? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. सांगली जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात सरकारने गुंतवणूक केली आहे का? राज्यातील ३६ जिल्ह्यांत कितीची गुंतवणूक झाली, हे सरकारने जाहीर करावे. आज सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. कापूस, कांदा, टॉमॅटोसह शेतीमालाला भाव नाही. उसावर बंधने घातली आहेत. एक डिसेंबरला कारखाने सुरू करण्याचा आदेश देतात आणि तोच आदेश पुन्हा बदलला जातो. सरकार म्हणून निर्णय घेताना तो विचारांतीच घेतला पाहिजे, त्याचे फायदे-तोटे पाहिले पाहिजेत, असेही पवार म्हणाले धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले? भाजप सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे जाहीरपणे सांगितले होते. मंत्रिमंडळाच्या आजवर शंभरहून अधिक बैठका झाल्या. पण धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. सरकारकडून केवळ वेळ मारून नेण्यासाठी आश्वासने दिली जात असल्याची टीकाही पवार यांनी केली.