शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

झेडपी पदाधिकारी बदलाबाबत भाजप सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST

भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कमळ फुलविले आहे. चार वर्षे सत्ताही टिकविली असून एक वर्ष शिल्लक आहे. पहिल्या तीन ...

भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कमळ फुलविले आहे. चार वर्षे सत्ताही टिकविली असून एक वर्ष शिल्लक आहे. पहिल्या तीन वर्षांत अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उत्तम कामगिरी केली. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा त्यांना विकासकामांसाठी फायदा झाला.

उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीसाठी ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपद आरक्षित होते. जानेवारी २०२० मध्ये या पदावर मिरज तालुक्यातून प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू आणि पलूस तालुक्यातून अश्विनी पाटील इच्छुक होत्या. प्राजक्ता कोरे यांनी अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. अन्य सभापतिपदासाठीही भाजप आणि मित्रपक्षांतील सदस्य इच्छुक होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षासाठी संधी दिल्यानंतर उर्वरित वर्षासाठी संधी देऊ, असे आश्वासन देऊन भाजपच्या कोअर कमिटीने त्यांना शांत केले होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल गुरुवारी संपला; पण, सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पदाधिकारी बदलाबाबत निर्णय घेतलेला नाही.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख याबाबत म्हणाले की, ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करावा, याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा कोअर कमिटीची बैठक आहे. त्यामध्ये पदाधिकारी बदलावर ठोस निर्णय होईल. इच्छुक सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे.

चौकट

आघाडीला गरज बहुमताची

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांकडे भाजपचे २५, रयत विकास आघाडीचे चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन आणि शिवसेनेचे तीन अशी ३४ सदस्य संख्या होती. राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५, काँग्रेसकडे नऊ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अशी २५ सदस्यसंख्या आहे. आघाडीच्या नेत्यांनी बदलासाठी प्रयत्न केले नाहीत. बदलाचा निर्णय झाला तर ३४ सदस्य भाजपबरोबर राहतील का, याची चाचपणी भाजपचे नेते करीत आहेत.