शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

झेडपी पदाधिकारी बदलाबाबत भाजप सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST

भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कमळ फुलविले आहे. चार वर्षे सत्ताही टिकविली असून एक वर्ष शिल्लक आहे. पहिल्या तीन ...

भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कमळ फुलविले आहे. चार वर्षे सत्ताही टिकविली असून एक वर्ष शिल्लक आहे. पहिल्या तीन वर्षांत अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उत्तम कामगिरी केली. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा त्यांना विकासकामांसाठी फायदा झाला.

उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीसाठी ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपद आरक्षित होते. जानेवारी २०२० मध्ये या पदावर मिरज तालुक्यातून प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू आणि पलूस तालुक्यातून अश्विनी पाटील इच्छुक होत्या. प्राजक्ता कोरे यांनी अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. अन्य सभापतिपदासाठीही भाजप आणि मित्रपक्षांतील सदस्य इच्छुक होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षासाठी संधी दिल्यानंतर उर्वरित वर्षासाठी संधी देऊ, असे आश्वासन देऊन भाजपच्या कोअर कमिटीने त्यांना शांत केले होते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल गुरुवारी संपला; पण, सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पदाधिकारी बदलाबाबत निर्णय घेतलेला नाही.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख याबाबत म्हणाले की, ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करावा, याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा कोअर कमिटीची बैठक आहे. त्यामध्ये पदाधिकारी बदलावर ठोस निर्णय होईल. इच्छुक सदस्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे.

चौकट

आघाडीला गरज बहुमताची

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांकडे भाजपचे २५, रयत विकास आघाडीचे चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन आणि शिवसेनेचे तीन अशी ३४ सदस्य संख्या होती. राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५, काँग्रेसकडे नऊ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अशी २५ सदस्यसंख्या आहे. आघाडीच्या नेत्यांनी बदलासाठी प्रयत्न केले नाहीत. बदलाचा निर्णय झाला तर ३४ सदस्य भाजपबरोबर राहतील का, याची चाचपणी भाजपचे नेते करीत आहेत.