शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 15:47 IST

मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्देभाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्यापृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा

सांगली : मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.सांगली मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, आ. रामहरी रुपनवर, माजी महापौर हारुण शिकलगार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर, मनगू सरगर उपस्थित होते. काठी व घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा महाठग, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छोटे ठग आहेत. भाजप हा अल्पसंख्याक व दीन-दलितांचा पक्ष नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कधीही सामाजिक न्याय मिळणार नाही. इतर धर्मांची पायमल्ली सरकारने केली आहे. भाजपचे नेते सतत दुसऱ्या धर्मांबद्दल अनादराची भावना प्रदर्शित करीत आहेत. सर्वांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या मंडल आयोगाला त्यांनी विरोध केला होता. सत्तेवर आल्यानंतरही त्यांचे तेच धोरण कायम आहे. संविधानाबद्दल प्रेम नसलेल्या भाजप-सेनेकडून सामान्यांना न्याय मिळणार नाही.

भाजपकडून आजपर्यंत शून्य विकास झालेला आहे. केवळ मुखी विकास आणि कृती काहीच नाही. आम्ही घटना बदलण्यासाठी निवडून आलोय,असे ते ठामपणे सांगत आहेत. हिंदू महासभा, बजरंग दलाचे लोक घटनेविरोधात आहेत. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तेवर येताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. अद्याप हा समाज आरक्षणापासून वंचितच राहिला आहे. धनगर समाजाने भाजपला मतदान करू नये.

टॅग्स :sangli-acसांगलीvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस