शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 15:47 IST

मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्देभाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्यापृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा

सांगली : मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.सांगली मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, आ. रामहरी रुपनवर, माजी महापौर हारुण शिकलगार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर, मनगू सरगर उपस्थित होते. काठी व घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा महाठग, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छोटे ठग आहेत. भाजप हा अल्पसंख्याक व दीन-दलितांचा पक्ष नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कधीही सामाजिक न्याय मिळणार नाही. इतर धर्मांची पायमल्ली सरकारने केली आहे. भाजपचे नेते सतत दुसऱ्या धर्मांबद्दल अनादराची भावना प्रदर्शित करीत आहेत. सर्वांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या मंडल आयोगाला त्यांनी विरोध केला होता. सत्तेवर आल्यानंतरही त्यांचे तेच धोरण कायम आहे. संविधानाबद्दल प्रेम नसलेल्या भाजप-सेनेकडून सामान्यांना न्याय मिळणार नाही.

भाजपकडून आजपर्यंत शून्य विकास झालेला आहे. केवळ मुखी विकास आणि कृती काहीच नाही. आम्ही घटना बदलण्यासाठी निवडून आलोय,असे ते ठामपणे सांगत आहेत. हिंदू महासभा, बजरंग दलाचे लोक घटनेविरोधात आहेत. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तेवर येताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. अद्याप हा समाज आरक्षणापासून वंचितच राहिला आहे. धनगर समाजाने भाजपला मतदान करू नये.

टॅग्स :sangli-acसांगलीvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस