शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

भाजपकडून योजनांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 30, 2016 23:58 IST

जयंत पाटील : मिरजवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

आष्टा : आमच्या आघाडी शासनाने रोजगार हमी योजनेसारख्या योजनांतून राज्यातील पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात केले़ मात्र भाजप युती शासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केलेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा योजनांना पैसे देताना शासन दुजाभाव करीत असून, विदर्भासाठी निधी देताना शासन जसा हात ढिला सोडते, निधींची खैरात करते, तसा राज्याच्या इतर भागात निधी देताना सोडत नाही, असा आरोप माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.मिरजवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण, चौदाव्या वित्त आयोगातून नरसोबा मंदिर व साळुंखे गल्लीत पेव्हिंग ब्लॉक व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खोत मळा ते चव्हाण मळा रस्ता मुरुमीकरण आदी कामे केली आहेत. या विकास कामांचे आ़ पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, माजी सभापती सौ़ पपाली कचरे, उपसभापती सौ़ भाग्यश्री शिंदे, माजी उपसभापती वैभव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटाबंदीच्या गोंधळाचा अंदाज आलेला नाही़. सामान्य माणसांचे हाल सुरू आहेत़ तरीही ते देशाला पन्नासाव्या दिवशी जोरात भाषण देतील़ ते प्रभावी वक्ते आहेत. काँग्रेस पक्षानेही आता त्यांच्या तोडीस तोड प्रभावी वक्ता पुढे आणायला हवा़ देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. मग काळा पैसा बाहेर आला का? जिल्हा मध्यवर्ती बँकांना नोटा बदलण्यास बंदी करून शासनाने ग्रामीण भाग व शेतकऱ्यांवर अविश्वासच व्यक्त केलेला आहे़ सामान्य माणसांच्या प्रश्नांवर संघर्ष उभा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा़ आपल्याकडे आता वेगवेगळे पुढारी येतील, मोठमोठ्या घोषणा करतील़ पण त्यांना फसू नका, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव साळुंखे यांनी, आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातूनच गावाचा, भागाचा विकास झाल्याचे सांगून, त्यांना साथ देण्याचे आवाहन केले. माजी जि़ प़ सदस्य संभाजी कचरे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, महिला तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव, राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड, पंडित नांगरे, यशवंत गायकवाड, वसंतराव सावंत, विलासराव पाटील, काशिनाथ खोत, पोलिसपाटील हरिदास पाटील, विष्णू सावंत, सुरेंद्र साळुंखे, हरी खिलारे यावेळी उपस्थित होते़ सरपंच सौ. जयश्री हंकारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ निशिकांत पाटील यांनी आभार मानले़ दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)नोटाबंदीच्या समर्थनार्थ : सरकारकडून उदोउदो सध्या समाजात नोटाबंदीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले असले तरी या नोटाबंदीचा का डांगोरा फिटण्यात येत आहे हेच सामान्य नागरिकांना समजत नाही. याचा फ ायदा उद्योजकांना झाला असून सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. तरीही सरकार नोटाबंदीचा उदोउदो करत आहे. हे लोकशाहीमध्ये धोक्याचे होत असून याचा परिणाम सामान्य जीवनावर विपरित होत आहे. याबाबत सामान्य माणसांचा आवाजही दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे,.