शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून योजनांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 30, 2016 23:58 IST

जयंत पाटील : मिरजवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

आष्टा : आमच्या आघाडी शासनाने रोजगार हमी योजनेसारख्या योजनांतून राज्यातील पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात केले़ मात्र भाजप युती शासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केलेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा योजनांना पैसे देताना शासन दुजाभाव करीत असून, विदर्भासाठी निधी देताना शासन जसा हात ढिला सोडते, निधींची खैरात करते, तसा राज्याच्या इतर भागात निधी देताना सोडत नाही, असा आरोप माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.मिरजवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण, चौदाव्या वित्त आयोगातून नरसोबा मंदिर व साळुंखे गल्लीत पेव्हिंग ब्लॉक व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खोत मळा ते चव्हाण मळा रस्ता मुरुमीकरण आदी कामे केली आहेत. या विकास कामांचे आ़ पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, माजी सभापती सौ़ पपाली कचरे, उपसभापती सौ़ भाग्यश्री शिंदे, माजी उपसभापती वैभव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटाबंदीच्या गोंधळाचा अंदाज आलेला नाही़. सामान्य माणसांचे हाल सुरू आहेत़ तरीही ते देशाला पन्नासाव्या दिवशी जोरात भाषण देतील़ ते प्रभावी वक्ते आहेत. काँग्रेस पक्षानेही आता त्यांच्या तोडीस तोड प्रभावी वक्ता पुढे आणायला हवा़ देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. मग काळा पैसा बाहेर आला का? जिल्हा मध्यवर्ती बँकांना नोटा बदलण्यास बंदी करून शासनाने ग्रामीण भाग व शेतकऱ्यांवर अविश्वासच व्यक्त केलेला आहे़ सामान्य माणसांच्या प्रश्नांवर संघर्ष उभा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा़ आपल्याकडे आता वेगवेगळे पुढारी येतील, मोठमोठ्या घोषणा करतील़ पण त्यांना फसू नका, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव साळुंखे यांनी, आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातूनच गावाचा, भागाचा विकास झाल्याचे सांगून, त्यांना साथ देण्याचे आवाहन केले. माजी जि़ प़ सदस्य संभाजी कचरे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, महिला तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव, राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड, पंडित नांगरे, यशवंत गायकवाड, वसंतराव सावंत, विलासराव पाटील, काशिनाथ खोत, पोलिसपाटील हरिदास पाटील, विष्णू सावंत, सुरेंद्र साळुंखे, हरी खिलारे यावेळी उपस्थित होते़ सरपंच सौ. जयश्री हंकारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ निशिकांत पाटील यांनी आभार मानले़ दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)नोटाबंदीच्या समर्थनार्थ : सरकारकडून उदोउदो सध्या समाजात नोटाबंदीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले असले तरी या नोटाबंदीचा का डांगोरा फिटण्यात येत आहे हेच सामान्य नागरिकांना समजत नाही. याचा फ ायदा उद्योजकांना झाला असून सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. तरीही सरकार नोटाबंदीचा उदोउदो करत आहे. हे लोकशाहीमध्ये धोक्याचे होत असून याचा परिणाम सामान्य जीवनावर विपरित होत आहे. याबाबत सामान्य माणसांचा आवाजही दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे,.