शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम प्रतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करत आहे. देशात मागील सात वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु, सतत शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र शासन निर्णय घेत आहे, असा आरोप आमदार विक्रम सावंत यांनी केला.

जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात केंद्र सरकारने कृषी कायदे पाठीमागे घ्यावेत व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

आमदार विक्रम सावंत म्हणाले की, डिझेल, पेट्रोल व शेतीमालाला हमीभाव याचे भांडवल करून केंद्र सरकारने देशात सत्ता मिळवली आहे. परंतु, आता पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार महागाईविरोधात बोलण्यास तयार नाही. टोलवसुली व जीएसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. परंतु, विकास होताना दिसत नाही. कृषी कायद्यांविरोधात जत तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन जनजागृती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आप्पाराया बिराजदार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, मोहन माने-पाटील, तुकाराम माळी, इराण्णा निडोणी यांनीही मनोगत व्यक्त केले. विकास माने, नगरसेवक साहेबराव कोळी, आकाश बनसोडे, इराण्णा निडोनी, महादेव कोळी, ॲड. युवराज निकम, अशोक बन्नेनवार, नीलेश बामणे, मारुती पवार, संतोष भोसले आदी उपस्थित होते.