शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

शिराळा तालुक्यात भाजपला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : शिराळा तालुक्यात आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा सततचा जनसंपर्क आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : शिराळा तालुक्यात आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा सततचा जनसंपर्क आणि मतदारसंघातील विकासकामे, तर दुसरीकडे माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांचा कमी होत असलेला संपर्क यामुळे तालुक्यात भाजपमध्ये दिवसेंदिवस गळती सुरू आहे. अनेक गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत जात आहेत. यामुळे भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांसमाेर डोकेदुखी निर्माण झाली आहे.

गतवेळी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे दोन नेते एकत्र आल्याने भाजपची ताकद वाढल्याचे चित्र होते. मात्र, युवा नेते सम्राट महाडिक यांची अपक्ष उमेदवारी आणि दोन्ही नेते एकत्र असतानाही मानसिंगराव नाईक यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. त्यातच राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने विकासकामांसाठीच्या निधीवर मर्यादा आल्या. देशात सत्ता असूनही त्याचा फायदा घेता येत नसल्याने दाेन्ही नेत्यांसमाेर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्या ऐक्याची ताकद कागदावरच राहिली. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असून फायदा नाही. पंचायत समिती नाही, बाजार समितीत सत्यजित देशमुख मानसिंगराव नाईक गटाबरोबर आहेत. देशमुख यांच्याकडे मोठा कोणताही उद्याेग नाही तर शिवाजीराव नाईक यांचे उद्याेग-व्यवसाय अडचणीत आहेत. दुसरीकडे मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास उद्याेग समूहातील सर्वच प्रकल्प जोरात सुरू आहेत. सूतगिरणी सुरु करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. पालकमंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठ्या निधी मिळत आहे. मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांचा नियमित संपर्क असल्याने सामान्य कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. परिणामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांना त्रासाच्या ठरणार असल्याची चर्चा आहे. भाजपमधील पडझड वेळीच न रोखल्यास नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

चाैकट

महाडिक आतापासूनच चर्चेत

सम्राट महाडिक यांनी विधानसभेची अपक्ष लढवलेली निवडणूक, घेतलेले मतदान, त्यानंतर त्यांचा भाजपात झालेला पक्ष प्रवेश त्याचबरोबर सततचा जनसंपर्क आणि वैयक्तित संबंध याच्या जोरावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तेच प्रमुख दावेदार असणार अशी चर्चा आतापासूनच भाजप कार्यकर्त्यात सुरू आहे.