शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भाजप सर्वच आघाड्यांवर अपयशी

By admin | Updated: November 4, 2015 23:58 IST

सुमनताई पाटील : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

कवठेमहांकाळ : दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा शासनदरबारी मांडण्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील तसेच विजय सगरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी साडेअकराला मल्लिकार्जुन देवालयाजवळ पावणेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकारविरोधात थाळीनाद करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चैक, हरि मंदिर या मार्गावरून तहसी कार्यालयाकडे वळला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर कामे करण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात महागाई वाढली आहे, सिंचन योजना बंद पडल्या आहेत, शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, जनावरांचे चाऱ्याविना हाल सुरू आहेत. विजय सगरे म्हणाले की, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारने डिझेल, पेट्रोलवरचा अधिभार कमी करावा, सिंचन योजनांसाठी निधी द्यावा.राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नामदेव करगणे म्हणाले की, भाजप सरकार जातीयवादी लोकांचे सरकार आहे. ते भांडवलदारांना पोसत आहे. अशा सरकारला राष्ट्रवादी धडा शिकविल्यशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी टी. व्ही. पाटील, गणेश पाटील, सुरेखा कोळेकर आदींची भाषणे झाली. या मोर्चासाठी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, गणपती सगरे, सुरेश पाटील, नारायण पवार, जालिंदर देसाई, सुहास पाटील, कल्पना घागरे, चंद्रकांत सगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)