शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सर्वच आघाड्यांवर अपयशी

By admin | Updated: November 4, 2015 23:58 IST

सुमनताई पाटील : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा

कवठेमहांकाळ : दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा शासनदरबारी मांडण्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील तसेच विजय सगरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी साडेअकराला मल्लिकार्जुन देवालयाजवळ पावणेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकारविरोधात थाळीनाद करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चैक, हरि मंदिर या मार्गावरून तहसी कार्यालयाकडे वळला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर कामे करण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात महागाई वाढली आहे, सिंचन योजना बंद पडल्या आहेत, शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, जनावरांचे चाऱ्याविना हाल सुरू आहेत. विजय सगरे म्हणाले की, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारने डिझेल, पेट्रोलवरचा अधिभार कमी करावा, सिंचन योजनांसाठी निधी द्यावा.राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नामदेव करगणे म्हणाले की, भाजप सरकार जातीयवादी लोकांचे सरकार आहे. ते भांडवलदारांना पोसत आहे. अशा सरकारला राष्ट्रवादी धडा शिकविल्यशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी टी. व्ही. पाटील, गणेश पाटील, सुरेखा कोळेकर आदींची भाषणे झाली. या मोर्चासाठी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, गणपती सगरे, सुरेश पाटील, नारायण पवार, जालिंदर देसाई, सुहास पाटील, कल्पना घागरे, चंद्रकांत सगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)