शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर पालिकेसाठी भाजप द्विधावस्थेत

By admin | Updated: October 4, 2016 01:02 IST

निवडणुकीचे वेध : विकास आघाडीची बिघाडी करण्याचे मनसुबे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे भाजपचे कार्यकर्ते रिचार्ज

अशोक पाटील -- इस्लामपूर महाआघाडीतील नेते खासदार राजू शेट्टी यांनी वाळवा-शिराळ्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात भाजप, शिवसेना, वेळ पडल्यास काँग्रेससह इतर घटकपक्षांची मोट बांधण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांनी, इस्लामपूर पालिका निवडणुकीसाठी शेट्टी यांच्या धोरणाबाबत संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्यापासून भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. ही ऊर्जा पालिका निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यासाठी विक्रम पाटील यांनी पक्षाच्यावतीने अभियान राबविले. त्याचा समारोप इस्लामपुरातील गांधी चौकात सभेने करण्यात आला. या अभियानाला माजी आमदार भगवानराव साळुंखे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी पाठिंबा दिला. परंतु पालिकेतीलच भाजपचे विरोधी पक्षनेते, जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनीच अभियानाकडे पाठ फिरवली होती. आगामी पालिका निवडणुकीत फक्त भाजपच्या नेतृत्वाखाली येईल त्यांनाच घेऊन निवडणुकीत उतरू, असा ठाम विश्वास व्यक्त करुन विक्रम पाटील यांनी, खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीविरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना तडा दिला आहे. तसेच बाबासाहेब सूर्यवंशी यांनी, आगामी पालिका निवडणुकीत शहर सुधार समिती आणि विकास आघाडीची परंपरा कायम ठेवण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या धोरणाविषयी भाजपमध्ये आजही मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.निवडणुकीतच : एकीचे दर्शनगेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीविरोधात शहर सुधार समिती, विकास आघाडी अशा आघाड्या झाल्या. प्रत्येक निवडणुकीत विकास आराखडा, निकृष्ट रस्ते, झालेला भ्रष्टाचार यावरच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. परंतु फक्त निवडणुकीपुरतेच विरोधक एकत्र येत असल्याने, मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.विक्रमभाऊंचे स्वप्नराज्यातील युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वाटेगाव (ता. वाळवा) येथे जनता कारखाना उभारण्याचे स्वप्न अशोकदादा पाटील यांना दाखविण्यात आले होते. परंतु पुढे त्या कारखान्याबाबत त्याचे काहीही झाले नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रम पाटील यांना साखर कारखान्याचे पुन्हा स्वप्न दाखविण्यात आले आहे. यातून तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी ग्वाही विक्रम पाटील यांनी दिली आहे.सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकांमध्ये वापरला जातो ‘सबसे बडा रुपया’आतापर्यंतच्या पालिकेच्या सहा निवडणुकांमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाषणबाजीवेळी नागरिकांचा विरोधकांच्या सभांना मोठा प्रतिसाद दिसतो. परंतु शेवटच्या टप्प्यात सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘अर्थ’पूर्ण हालचाली होतात. विरोधकांच्या सभांना दिसणारी गर्दी मतांमध्ये रूपांतरीत होत नाही.