शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शेतकऱ्यांशी संवाद न साधता खिळे ठोकून अडथळे उभे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST

इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही ...

इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवादाऐवजी त्यांच्या वाटेवर खिळे ठोकले, अडथळे उभे केले. पोलिसांकडून लाठीहल्ला केला. काँग्रेसने जनतेला अशी वागणूक कधी दिली नाही, अशा शब्दांत युवा नेते प्रतीक पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला.

वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व प्रतीक पाटील यांनी केले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आष्टा येथून सुरू झालेल्या या ट्रॅक्टर मोर्चातील कार्यकर्ते तीनशेवर ट्रॅक्टर घेऊन इस्लामपूरच्या तहसील कार्यालयावर धडकले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.

प्रतीक पाटील म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे बदलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्या होत्या.

संग्रामसिंह पाटील म्हणाले, मोदी-शहांनी देशामध्ये हिटलरशाही सुरू केली आहे. संपूर्ण देश त्याचा सामना करत आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, सुस्मिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी छाया पाटील, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, संजय पाटील, अमोल गुरव, विश्वजित पाटील, हनुमंत कदम, उद्धव पाटील, सतीश साळी उपस्थित होते.

फोटो - ०९०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर मोर्चा न्यूज : केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे निवेदन इस्लामपूर येथे प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, विजयराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे उपस्थित होते.