शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भाजपने शेतकऱ्यांशी संवाद न साधता खिळे ठोकून अडथळे उभे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST

इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही ...

इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवादाऐवजी त्यांच्या वाटेवर खिळे ठोकले, अडथळे उभे केले. पोलिसांकडून लाठीहल्ला केला. काँग्रेसने जनतेला अशी वागणूक कधी दिली नाही, अशा शब्दांत युवा नेते प्रतीक पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला.

वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व प्रतीक पाटील यांनी केले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आष्टा येथून सुरू झालेल्या या ट्रॅक्टर मोर्चातील कार्यकर्ते तीनशेवर ट्रॅक्टर घेऊन इस्लामपूरच्या तहसील कार्यालयावर धडकले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.

प्रतीक पाटील म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे बदलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्या होत्या.

संग्रामसिंह पाटील म्हणाले, मोदी-शहांनी देशामध्ये हिटलरशाही सुरू केली आहे. संपूर्ण देश त्याचा सामना करत आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, सुस्मिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी छाया पाटील, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, संजय पाटील, अमोल गुरव, विश्वजित पाटील, हनुमंत कदम, उद्धव पाटील, सतीश साळी उपस्थित होते.

फोटो - ०९०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर मोर्चा न्यूज : केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे निवेदन इस्लामपूर येथे प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, विजयराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे उपस्थित होते.