शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शेतकऱ्यांशी संवाद न साधता खिळे ठोकून अडथळे उभे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST

इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही ...

इस्लामपूर : काँग्रेसने देशात ७० वर्षांत काय केले, असे भाजपकडून विचारले जाते. मात्र, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवादाऐवजी त्यांच्या वाटेवर खिळे ठोकले, अडथळे उभे केले. पोलिसांकडून लाठीहल्ला केला. काँग्रेसने जनतेला अशी वागणूक कधी दिली नाही, अशा शब्दांत युवा नेते प्रतीक पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला.

वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व प्रतीक पाटील यांनी केले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आष्टा येथून सुरू झालेल्या या ट्रॅक्टर मोर्चातील कार्यकर्ते तीनशेवर ट्रॅक्टर घेऊन इस्लामपूरच्या तहसील कार्यालयावर धडकले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.

प्रतीक पाटील म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे बदलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्या होत्या.

संग्रामसिंह पाटील म्हणाले, मोदी-शहांनी देशामध्ये हिटलरशाही सुरू केली आहे. संपूर्ण देश त्याचा सामना करत आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, सुस्मिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी छाया पाटील, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, संजय पाटील, अमोल गुरव, विश्वजित पाटील, हनुमंत कदम, उद्धव पाटील, सतीश साळी उपस्थित होते.

फोटो - ०९०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर मोर्चा न्यूज : केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे निवेदन इस्लामपूर येथे प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, विजयराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे उपस्थित होते.