शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

भाजपाने मराठा आरक्षण जाणीवपूर्वक लटकवले - अरुण लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST

पलूस : ज्‍या भाजपा सरकारने राज्‍यात मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले, त्‍याचवेळी त्‍यांचे केंद्रातही बहुमत होते. तेव्‍हाच त्‍यांना या ...

पलूस : ज्‍या भाजपा सरकारने राज्‍यात मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले, त्‍याचवेळी त्‍यांचे केंद्रातही बहुमत होते. तेव्‍हाच त्‍यांना या आरक्षणाची पूर्तता करता आली असती; परंतु त्‍यांनी तसे जाणीवपूर्वक केले नाही. राजकीय स्वार्थातून भाजपानेच मराठा आरक्षण लटकवले, अशी टीका आमदार अरुण लाड यांनी केली.

लाड म्‍हणाले की, मराठा आरक्षणाबाबत १९९२ पासून इंदिरा साहणी यांच्‍या निकालाच्‍या पार्श्‍वभूमीवर आणखी काही राज्‍यात ५० टक्‍केपेक्षा जास्‍त आरक्षण विशिष्‍ठ परिस्‍थिती समजून देण्यात आले. यामुळे मराठा आरक्षणाच्‍या प्रश्‍नानेही उचल खाल्‍ली; पण नुकताच सर्वाेच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्‍या निकालात मराठा समाज हा मागासलेला नसल्‍याने अपवादात्‍मक परिस्‍थिती मानुन या समाजाला आरक्षण देता येणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले; परंतु भाजपा सरकारच्‍या काळात ही घटनात्‍मक अडचण माहीत असूनही या समाजाला आरक्षण देण्याबाबत घटनेत तरतूद न करता आरक्षणाची घोषणा करण्यात आली. याचवेळी न्‍यायालयात टिकेल, असे आरक्षण भाजपा घेऊ शकत होते; परंतु त्‍यांनी तसे केले नाही. उलट आरक्षणाचा मुद्दा मुद्दाम पेटवत ठेवून त्‍यांवर राजकारण करत राहिले.

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्‍या निकालात स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, ५० टक्‍केपेक्षा जास्‍त आरक्षण देण्‍याचे अधिकार राज्‍यांच्‍या अखत्‍यारित नाहीत; पण भाजपाचे नेते गल्‍ली ते दिल्‍लीपर्यंत महाविकास आघाडीला हा मराठा समाजाच्‍या आरक्षणाचा मुद्दा व्‍यवस्‍थित न हाताळल्यामुळे हे आरक्षण आजवर न मिळाल्‍याचा डांगाेरा पिटत आहेत; परंतु न्‍यायालयाने मराठा समाज मागास नसल्‍याने आरक्षण देता येत नसल्‍याचे सांगितले आहे.

राज्‍यातील आणि केंद्रातील सर्व राजकीय नेत्‍यांनी एकत्रित येऊन आजही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. न्‍यायालयाच्‍या निकालाप्रणाने घटनात्‍मक बदल करून केंद्र शासन, पंतप्रधान व राष्‍ट्रपती यांच्याकडूनच मराठा समाजाला विशेष बाब म्‍हणून न्‍यायालयात टिकेल, असे आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न हाेणे गरजेचे आहे.