शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसची विचारधारा एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य अधिवेशन येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते, यावेळी मेश्राम बोलत होते. अधिवेशनास मालेगावचे मौलाना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य अधिवेशन येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते, यावेळी मेश्राम बोलत होते. अधिवेशनास मालेगावचे मौलाना अब्दुल हमीद अझहरी, राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी प्रा. विलास खरात, बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. नामदेव करगणे उपस्थित होते.मेश्राम म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर विशिष्ठ समाजालाच संसदेवर जादा प्रतिनिधीत्व दिले. नोकरशाही, न्यायालये व प्रसारमाध्यमांवर याच मंडळींचे वर्चस्व आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ त्यांच्याच वर्चस्वाखाली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात ६५ हजार दंगली झाल्या. त्यात लाखो मुस्लिम मारले गेले. त्यामागे धार्मिक शक्तींचाच हात असल्याचे तत्कालिन सरकार सांगत होते. पण त्या शक्तींवर कारवाई करीत नव्हते. यामागे मुसलमानांना असुरक्षित ठेवून मतांची पोळी भाजण्याचाच डाव होता. भाजपची सत्ता आता आली आहे. मुसलमानांसाठी काँग्रेस हा छुपा, तर भाजप हा उघड शत्रू आहे. दोघांची विचारधाराही एकच आहे. दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांच्यावर तीन हजार वर्षांपासून अन्याय केला जात आहे.आता मुस्लिमसमाजावर अन्याय सुरू झाला आहे. बहुजन व गोरगरीब, दु:खी जनतेच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी मुस्लिम समाजाने सहकार्य करावे. मौलाना अझहरी म्हणाले की, मुस्लिम हे याच देशात जन्मले आहेत. जे मुस्लिमांना बाहेरच्या देशात जा, असे म्हणतात, त्यांचा डीएनए काय आहे, हे तपासावे. तीन तलाकच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे अश्रू ढाळत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये काय केले? तिहेरी तलाख हा मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे. कायद्याने तो रद्द होऊ शकत नाही. गोरक्षेच्या नावाखाली खोटे आरोप केले जात आहेत.हीच परिस्थिती कायम राहिली, तर देशातील जनतेत असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल.हिंंदू-मुस्लिम समाजात भांडणे लावून लोकांना आगीत ढकलले जात आहे. देश वाचविण्यासाठी सर्वसमाजांनी एकत्र आले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज नकरणारा भारत काहींना तयार करायचा आहे.यावेळी आॅल इंडिया एकता फोरमचे मुफ्ती फारूख, मौलाना फैयाजुल सिद्दिकी हाजी, डॉ. अब्दुल मन्नान शेख, मौलाना अब्दुलरऊफ, मुफ्ती सालीम कासमी,रफीक मुजावर, मुफ्ती मुजम्मील, असिफ बावा, आदी उपस्थितहोते.५२ टक्के मतांसाठी!गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजाची लोकसंख्या पाव टक्का आहे. तरीही भाजपने त्यांना पंतप्रधान केले. यामागे देशातील ५२ टक्के ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी राहावा, अशीच खेळी होती. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघच देश चालवत असून, केवळ दिखाव्यासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवला आहे, अशी टीकाही वामन मेश्राम यांनी केली.