शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

भाजप-काँग्रेसची विचारधारा एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य अधिवेशन येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते, यावेळी मेश्राम बोलत होते. अधिवेशनास मालेगावचे मौलाना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य अधिवेशन येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते, यावेळी मेश्राम बोलत होते. अधिवेशनास मालेगावचे मौलाना अब्दुल हमीद अझहरी, राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी प्रा. विलास खरात, बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. नामदेव करगणे उपस्थित होते.मेश्राम म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर विशिष्ठ समाजालाच संसदेवर जादा प्रतिनिधीत्व दिले. नोकरशाही, न्यायालये व प्रसारमाध्यमांवर याच मंडळींचे वर्चस्व आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ त्यांच्याच वर्चस्वाखाली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात ६५ हजार दंगली झाल्या. त्यात लाखो मुस्लिम मारले गेले. त्यामागे धार्मिक शक्तींचाच हात असल्याचे तत्कालिन सरकार सांगत होते. पण त्या शक्तींवर कारवाई करीत नव्हते. यामागे मुसलमानांना असुरक्षित ठेवून मतांची पोळी भाजण्याचाच डाव होता. भाजपची सत्ता आता आली आहे. मुसलमानांसाठी काँग्रेस हा छुपा, तर भाजप हा उघड शत्रू आहे. दोघांची विचारधाराही एकच आहे. दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांच्यावर तीन हजार वर्षांपासून अन्याय केला जात आहे.आता मुस्लिमसमाजावर अन्याय सुरू झाला आहे. बहुजन व गोरगरीब, दु:खी जनतेच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी मुस्लिम समाजाने सहकार्य करावे. मौलाना अझहरी म्हणाले की, मुस्लिम हे याच देशात जन्मले आहेत. जे मुस्लिमांना बाहेरच्या देशात जा, असे म्हणतात, त्यांचा डीएनए काय आहे, हे तपासावे. तीन तलाकच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे अश्रू ढाळत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये काय केले? तिहेरी तलाख हा मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे. कायद्याने तो रद्द होऊ शकत नाही. गोरक्षेच्या नावाखाली खोटे आरोप केले जात आहेत.हीच परिस्थिती कायम राहिली, तर देशातील जनतेत असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल.हिंंदू-मुस्लिम समाजात भांडणे लावून लोकांना आगीत ढकलले जात आहे. देश वाचविण्यासाठी सर्वसमाजांनी एकत्र आले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज नकरणारा भारत काहींना तयार करायचा आहे.यावेळी आॅल इंडिया एकता फोरमचे मुफ्ती फारूख, मौलाना फैयाजुल सिद्दिकी हाजी, डॉ. अब्दुल मन्नान शेख, मौलाना अब्दुलरऊफ, मुफ्ती सालीम कासमी,रफीक मुजावर, मुफ्ती मुजम्मील, असिफ बावा, आदी उपस्थितहोते.५२ टक्के मतांसाठी!गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजाची लोकसंख्या पाव टक्का आहे. तरीही भाजपने त्यांना पंतप्रधान केले. यामागे देशातील ५२ टक्के ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी राहावा, अशीच खेळी होती. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघच देश चालवत असून, केवळ दिखाव्यासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवला आहे, अशी टीकाही वामन मेश्राम यांनी केली.