शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या खेळीने जिल्हा परिषदेत भाजप सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी बदल केला तर होऊ शकतो, असे विधान पालकमंत्री जयंत ...

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी बदल केला तर होऊ शकतो, असे विधान पालकमंत्री जयंत पाटील यांनी विटा येथे केल्यानंतर भाजप सावध झाली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल बारगळण्याची चर्चा रंगली आहे. बदलास नेते तयार नसल्यामुळे भाजपमधील इच्छुक नाराज आहेत.

जिल्हा परिषदेत विद्यमान पदाधिकाऱ्यांना बदलून नव्याने संधी द्यावी, या मागणीसाठी काही सदस्यांनी महिन्याभरापासून जोर लावला आहे. मात्र, काठावर बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपला बदल करणे सोपे नाही. स्पष्ट बहुमत असलेली महापालिकेची सत्ता भाजपने तेथील बदलावेळी गमावली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसमोर ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. असे असले तरी बदलासाठी इच्छुक असलेल्यांनी नेत्यांकडे मागणी लावून धरल्याने हा विषय संपलेला नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमावर भाजपच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. जयंत पाटील यांनी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही लवकरच जाणार असत्याचे वक्तव्य केले होते. त्यानतर भाजपा नेते सावध झाले होते.

जयंत पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी बदलाचा विषय तूर्त लांबवला होता. बदलाचा विषय बारगळणार अशी चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री पाटील यांनी रविवारी पुन्हा विटा येथे पदाधिकारी बदलाच्या विषयावर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपकडे काठावरचे बहुमत आहे. पाठिंबा दिलेल्या शिवसेना आणि घोरपडे गटाची भूमिका महत्त्वाची आहे. या गटांशी चर्चा केल्याशिवाय भाजपला बदलाचा निर्णय घेणे शक्य नाही.

चौकट

पदाधिकारी बदलाबाबत भाजपमध्ये मतभिन्नता

पदाधिकारी बदलासाठी खा. संजयकाका पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली आहे, पण भाजपच्या अन्य नेत्यांनी जयंत पाटील यांचा धसका घेतला आहे. यामुळे भाजपच्या त्या नेत्यांनी पदाधिकारी बदल नकोच, असे स्पष्ट चंद्रकांत पाटील यांना सांगितले आहे. बदलाबाबत भाजप नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. एक गट बदल करावा म्हणत आहे, तर दुसरा गट बदलाला विरोध करीत आहे.