शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात भाजप बॅकफूटवर; राष्ट्रवादीला अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम संपला आहे. या निवडणुकीत भाजपचा गट बॅकफूटवर गेला आहे, तर राष्ट्रवादीला पुन्हा ...

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम संपला आहे. या निवडणुकीत भाजपचा गट बॅकफूटवर गेला आहे, तर राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्चस्वाच्या श्रेयवादासाठी दोन्ही गटांकडून अनेक ग्रामपंचायतींवर दावा केला जात आहे.

सुरुवातीलाच तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर विसापूर, सिद्धेवाडी, ढवळीसारख्या ग्रामपंचायतींत संमिश्र फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. यावेळी अनेक गावांत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येत राजकीय दंगल टाळण्याचा प्रयत्न केला. ज्याठिकाणी असे प्रयोग झाले तेथे अशा संमिश्र पॅनलला घवघवीत यश मिळाले.

ज्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी काट्याची टक्कर झाली, तेथे मात्र बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे पारडे जड ठरले. सावळजसारखी महत्त्वाची ग्रामपंचायत भाजपला गमवावी लागली. चंद्रकांत पाटील यांच्या पश्‍चात जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील यांनी सावळज ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता ताब्यात घेत राजकीय कर्तृत्व सिद्ध केले.

मांजर्डेत यावेळी दिनकरदादा पाटील यांच्या पश्‍चात अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीची सत्ता कायम ठेवण्यात पंचायत समितीच्या सभापती कमल पाटील आणि मोहन पाटील यांना यश मिळाले. पेडमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करत ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात घेतली.

येळावीत भाजपच्या कारभाऱ्यांना सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश मिळाले. याठिकाणी काँग्रेसचे विजयअण्णा पाटील, विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून भाजपच्या ताब्यातून ग्रामपंचायत काढून घेतली. कवठेएकंद येथील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करण्यात भाजपला यश मिळाले. शेकापशी हातमिळवणी करून पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडल्यामुळे ही ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली होती.

बोरगाव येथे पंचायत समितीचे सदस्य संभाजी पाटील यांना सत्ता टिकवण्यात अपयश आले, तर हातनोलीमध्ये बाजार समितीचे सभापती अजित जाधव यांना सत्ता मिळवण्यात अपयश आले. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी भाजपची एकहाती सत्ता मिळवली. तुरचीत जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांना स्वत:च्या गावात सत्तास्थान गमावण्याची वेळ आली.

चौकट :

वर्चस्ववादासाठी दोन्ही गटांचा ग्रामपंचायतीवर दावा :

ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर तालुक्यावर वर्चस्व असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. सोशल मीडियावर अनेक ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता असल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला. काही कारभाऱ्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिशाभूल करून आम्ही तुमचेच असेही सांगितले. त्यामुळे निकाल लागला तरी काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे हा प्रश्‍न कायम राहिला असून सरपंच निवडीनंतरच याचा फैसला होणार आहे.