शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात भाजप बॅकफूटवर; राष्ट्रवादीला अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम संपला आहे. या निवडणुकीत भाजपचा गट बॅकफूटवर गेला आहे, तर राष्ट्रवादीला पुन्हा ...

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम संपला आहे. या निवडणुकीत भाजपचा गट बॅकफूटवर गेला आहे, तर राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्चस्वाच्या श्रेयवादासाठी दोन्ही गटांकडून अनेक ग्रामपंचायतींवर दावा केला जात आहे.

सुरुवातीलाच तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर विसापूर, सिद्धेवाडी, ढवळीसारख्या ग्रामपंचायतींत संमिश्र फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. यावेळी अनेक गावांत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येत राजकीय दंगल टाळण्याचा प्रयत्न केला. ज्याठिकाणी असे प्रयोग झाले तेथे अशा संमिश्र पॅनलला घवघवीत यश मिळाले.

ज्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी काट्याची टक्कर झाली, तेथे मात्र बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे पारडे जड ठरले. सावळजसारखी महत्त्वाची ग्रामपंचायत भाजपला गमवावी लागली. चंद्रकांत पाटील यांच्या पश्‍चात जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील यांनी सावळज ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता ताब्यात घेत राजकीय कर्तृत्व सिद्ध केले.

मांजर्डेत यावेळी दिनकरदादा पाटील यांच्या पश्‍चात अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीची सत्ता कायम ठेवण्यात पंचायत समितीच्या सभापती कमल पाटील आणि मोहन पाटील यांना यश मिळाले. पेडमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करत ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात घेतली.

येळावीत भाजपच्या कारभाऱ्यांना सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश मिळाले. याठिकाणी काँग्रेसचे विजयअण्णा पाटील, विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून भाजपच्या ताब्यातून ग्रामपंचायत काढून घेतली. कवठेएकंद येथील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करण्यात भाजपला यश मिळाले. शेकापशी हातमिळवणी करून पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडल्यामुळे ही ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली होती.

बोरगाव येथे पंचायत समितीचे सदस्य संभाजी पाटील यांना सत्ता टिकवण्यात अपयश आले, तर हातनोलीमध्ये बाजार समितीचे सभापती अजित जाधव यांना सत्ता मिळवण्यात अपयश आले. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी भाजपची एकहाती सत्ता मिळवली. तुरचीत जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांना स्वत:च्या गावात सत्तास्थान गमावण्याची वेळ आली.

चौकट :

वर्चस्ववादासाठी दोन्ही गटांचा ग्रामपंचायतीवर दावा :

ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागल्यानंतर तालुक्यावर वर्चस्व असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. सोशल मीडियावर अनेक ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता असल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला. काही कारभाऱ्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिशाभूल करून आम्ही तुमचेच असेही सांगितले. त्यामुळे निकाल लागला तरी काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे हा प्रश्‍न कायम राहिला असून सरपंच निवडीनंतरच याचा फैसला होणार आहे.