शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आयुक्त राबवितात भाजपचा अजेंडा

By admin | Updated: June 1, 2017 23:39 IST

आयुक्त राबवितात भाजपचा अजेंडा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठीच आयुक्त खेबूडकर हे भाजपचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप महापौर हारुण शिकलगार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. महापौर शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यातील संघर्ष पेटला आहे. दोन दिवसांपूर्वी महापौरांनी आयुक्तांना बंगल्यावरील बैठका बंद करा, असा दम भरला होता. गेल्या वर्षभरापासून दोघांत चांगला समन्वय होता. पण काही दिवसांपासून दोघात वितुष्ट निर्माण झाले आहे. आतापर्यंत महासभेत आयुक्त, प्रशासनाची बाजू महापौरांनी नेहमीच सारवून घेतली आहे. पण आता दोघांत संघर्ष निर्माण झाल्याने यापुढे पदाधिकारी विरूद्ध अधिकारी असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. ते म्हणाले, आयुक्त महापालिकेचे मालक झाल्याप्रमाणे बंगल्यात अधिकाऱ्यांच्या नुसत्या बैठका घेत आहेत. त्यामुळे सदस्यांना काही माहिती हवी असेल, फायलींचा निपटारा करायचा असेल, तर अधिकारी खुर्चीवरच नसतात. दुसरीकडे नागरिकांचा संताप वाढला की आयुक्त अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना समोर करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यायचे आणि प्रशासनाने ते राबवायचे असतात, असे असताना आयुक्त सदस्यांच्या फायलींवर शेरे मारत आहेत. विकास कामे मंजूर असतानाही ठेकेदार वर्कआॅर्डरशिवाय काम करायला तयार नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. गुंठेवारी भागाची दुरवस्था असताना आयुक्त ठामपणे निर्णय घेत नाहीत. आयुक्तांना सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम करायचा आहे, ते शहरातील विकास कामे थांबवून भाजपचा छुपा अजेंडा राबवत असल्याचा आरोपही केला. प्रतिनियुक्तीवरचा एकही अधिकारी सक्षमपणे काम करीत नाही. आयुक्त चुकीच्या पध्दतीने काम करीत आहेत. शहरातील नागरिक सुविधांपासून वंचित असताना आयुक्त अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन कचरा डेपोवर कशासाठी फिरत असतात. आयुक्तांना याबाबत वारंवार सांगूनही कामात सुधारणा होताना दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला. समन्वय बिघडला : संताप वाढलागेल्या काही दिवसांपासून महापौर शिकलगार आणि आयुक्त खेबूडकर यांच्यात समन्वय नसल्याचे चित्र समोर येत आहे. आयुक्त बंगल्यात बसून बैठका घेत असल्याने सदस्यांची कामे रखडली असल्याचा आरोप शिकलगार यांनी केला आहे. महापौर आणि आयुक्त यांच्यात संघर्ष सुरु आहे. अधिकारी सांगूनही काम करीत नाहीत, मात्र याचा फटका पदाधिकाऱ्यांना बसत आहे. शामरावनगरातील महिला पाण्यासाठी सतत महापालिकेवर मोर्चे काढत आहेत, पदाधिकारी, सदस्य यांना दोषी ठरवत आहेत. त्यामुळे महापौरांचा संताप वाढला आहे.