शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

भाजपमुळे विकास गतिमान

By admin | Updated: August 26, 2016 23:15 IST

पृथ्वीराज देशमुख : कडेगाव येथे तिरंगा रॅलीचा सांगता समारंभ

नेवरी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी नव्या पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरंगा रॅलीमुळे मिळाली आहे. असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. कडेगाव तालुक्यातील तिरंगा रॅलीची सांगता कडेगाव येथे करण्यात आली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख उपस्थित होते. देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांचे उचित स्मरण, देशाच्या सीमेवर रक्षणासाठी काम केलेले माजी सैनिक व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची संधी या रॅलीमुळे आली आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शासनाने घेतलेले निर्णय व शासकीय योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांनी भाजपच्या झेंड्याखाली काम करावे. रामापूर, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, चिंचणी, वांगी, शिवणी, वडियेरायबाग, आंबेगाव, नेवरी, भिकवडी, येतगाव, खेराडेवांगी, रायगाव, शाळगाव, विहापूर, शिवाजीनगर, खंबाळे, अपशिंगे, कोतवडे, नेर्लीमार्गे कडेगाव येथे रॅलीची सांगता झाली. प्रास्ताविक धनंजय देशमुख यांनी केले. यावेळी शिवाजीराव देशमुख, तानाजी देसाई, मोहन माळी, तानाजी रास्कर, दादासाहेब रास्कर, मोहनसिंग रजपूत, आप्पासाहेब मोरे या माजी सैनिकांचा, ज्येष्ठ नागरिक विष्णू रोकडे तसेच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रसेन देशमुख, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, प्रकाश निरंजन, ज्ञानेश्वर शिंदे, पी. के. गायकवाड, रमेश पवार, धोंडीराम महिंद, तानीज महिंद, विवेक भस्मे, श्रीजय देशमुख, कुमार कवठेकर उपस्थित होते. शिवाजी चन्ने यांनी आभार मानले. (वार्ताहर)