शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

भाजपमुळे विकास गतिमान

By admin | Updated: August 26, 2016 23:15 IST

पृथ्वीराज देशमुख : कडेगाव येथे तिरंगा रॅलीचा सांगता समारंभ

नेवरी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी नव्या पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरंगा रॅलीमुळे मिळाली आहे. असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. कडेगाव तालुक्यातील तिरंगा रॅलीची सांगता कडेगाव येथे करण्यात आली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख उपस्थित होते. देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांचे उचित स्मरण, देशाच्या सीमेवर रक्षणासाठी काम केलेले माजी सैनिक व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची संधी या रॅलीमुळे आली आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शासनाने घेतलेले निर्णय व शासकीय योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांनी भाजपच्या झेंड्याखाली काम करावे. रामापूर, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, चिंचणी, वांगी, शिवणी, वडियेरायबाग, आंबेगाव, नेवरी, भिकवडी, येतगाव, खेराडेवांगी, रायगाव, शाळगाव, विहापूर, शिवाजीनगर, खंबाळे, अपशिंगे, कोतवडे, नेर्लीमार्गे कडेगाव येथे रॅलीची सांगता झाली. प्रास्ताविक धनंजय देशमुख यांनी केले. यावेळी शिवाजीराव देशमुख, तानाजी देसाई, मोहन माळी, तानाजी रास्कर, दादासाहेब रास्कर, मोहनसिंग रजपूत, आप्पासाहेब मोरे या माजी सैनिकांचा, ज्येष्ठ नागरिक विष्णू रोकडे तसेच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रसेन देशमुख, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, प्रकाश निरंजन, ज्ञानेश्वर शिंदे, पी. के. गायकवाड, रमेश पवार, धोंडीराम महिंद, तानीज महिंद, विवेक भस्मे, श्रीजय देशमुख, कुमार कवठेकर उपस्थित होते. शिवाजी चन्ने यांनी आभार मानले. (वार्ताहर)