शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

राजकीय साठमारीत एमआयडीसीला खीळ

By admin | Updated: August 1, 2014 23:27 IST

प्रस्ताव प्रलंबित : अलकूडचा प्रश्न रखडला

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ  तालुक्यातील (एम) मणेराजुरीच्या माळरानावर औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव राजकीय खेळीत अडकला असल्याने तालुक्याच्या औद्योगिक विकासात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच सुमारे पंचवीस हजारांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे.दुष्काळग्रस्त कवठेमहांकाळ तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अलकूड एम मणेराजुरीच्या माळरानावर औद्योगिक वसाहतीचे काम तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. परंतु या औद्योगिक वसाहतीला राजकीय तिढे पडल्याने वसाहतीचा वाद राजकीय वळणावर पोहोचला. त्यामुळे हजारो तरुणांचे भवितव्य अंध:कारमय झाले आणि तालुक्याच्या विकासातही अडसर निर्माण झाला. दिवसेंदिवस तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे.हरोली, बोरगाव, अलकूड एम, गव्हाण, योगेवाडी, मणेराजुरी गावांना औद्योगिक वसाहतीमुळे कराच्यारूपाने दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. या उत्पन्नातून गावांचा विकास होण्यास मदत होणार होती. परंतु हा प्रस्ताव बारगळल्याने सर्वच बाबींवर पाणी सोडावे लागले आहे.गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांसाठी ही औद्योगिक वसाहत होऊ द्या, तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी ठोस पावले उचला, अशी आर्त हाक हे बेरोजगार तरुण देऊ लागले आहेत. औद्योगिक वसाहत झाल्यास तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्याचा विकास वेगाने होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे शासनाच्या टेक्स्टाईल क्लस्टर योजनेखाली येत आहेत. टेक्स्टाईल क्लस्टरमधील अंतर्भूत जिल्ह्यांना व जिल्ह्यातील तरुणांना (विशेषत: ग्रामीण) वस्त्रोद्योगातील कौशल्यपूर्ण ज्ञान घेऊन व्यवसाय निर्मिती करण्यास मोठ्या प्रमाणात संधी आहेत.तालुक्यातील काही गावांतून फळपिके उदा. डाळिंबे, द्राक्षे इतर भाजीपाला मोठ्या प्रमाणात अल्पदरामध्ये बाहेरील बाजारपेठेत जात आहे. या पिकांवर प्रक्रिया करता येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. त्याकरिता फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्रासारखी सुविधा उभी करता आली, तर शेतकऱ्यांना चांगला दर तर मिळू शकेलच, शिवाय तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचे जोडउद्योग करता येतील. आधुनिक तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना शेतीअवजारे, उत्पादने कमी दरात बाजारपेठेत उपलब्ध करून दिली, तर एक मोठी बाजारपेठ नवउद्योजकांना उपलब्ध होईल. सत्तेच्या राजकारणासाठी विकास कामांना खो घालण्याचे काम न करता तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्यासाठी प्रयत्न करावेत. औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर श्रेयवादाचा संघर्ष करीत बसण्यापेक्षा एकत्रित येऊन तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, अशीच मागणी आता जनतेतून व तरुणांच्याकडून होऊ लागली आहे.