शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

भोपाळच्या कंपनीचा सांगलीत १३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:01 IST

सांगली : गुंतवणूक रकमेला घसघशीत व्याज व तसेच साडेपाच वर्षांत दामदुप्पटचे आमिष दाखवून भोपाळ येथील ‘निर्मल इंम्प्राहोम कार्पोरेशन लिमिटेड’ ...

सांगली : गुंतवणूक रकमेला घसघशीत व्याज व तसेच साडेपाच वर्षांत दामदुप्पटचे आमिष दाखवून भोपाळ येथील ‘निर्मल इंम्प्राहोम कार्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीने सांगली, मिरजेसह जिल्ह्यातही अनेकांना गंडा घातल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. कंपनीत गुंतवणूक केलेल्या २५ जणांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुखासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कंपनीचा प्रमुख अभिषेक एस. चौहाण (रा. कालापिपाला), संचालक हरेश शर्मा, तुलसिंग चौधरी (त्रिकोडीया) निरंजन सक्सेना (भोपाळ), निर्मलादेवी चौहाण (कालापिपाल), लखन सोनी, (शहाजापूर, आंध्र प्रदेश) व व्यवस्थापक सुहास विजय गोकावे (सांगली) यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या सीबीआयच्या कोठडीत अटकेत आहेत. संशयितांनी कोल्हापूर रस्त्यावरील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ २०१२ मध्ये कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. गुंतवणूक रकमेला व्याज तसेच साडेपाच वर्षांत दुप्पट रक्कम दिली जाईल, असे आमिष दाखविले. लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडण्यासाठी त्यांनी सांगलीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एजंटांची नियुक्ती केली. त्यांना घसघशीत कमिशनचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून एजंटांनी लोकांना कंपनीत पैसे भरण्यास भाग पाडले.रविवारी २५ लोकांनी तक्रार केली. त्यांच्यावतीने उत्तम नामदेव बालटे (वय ३८, रा. विद्यानगर, आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बालटे हेही एजंट म्हणून काम करीत होते. त्यांनी स्वत:ही कंपनीत एक लाखाची रक्कम गुंतविली आहे. त्यांनी सांगली, जत, शिराळा, आटपाडी, मिरज व कर्नाटकातील अथणी येथील लोकांचे पैसे गोळा करून कंपनीत जमा केले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, भुवनेश्वर, भोपाळ येथेही कंपनीचे कार्यालय सुरू होते. २०१५ मध्ये कंपनीने अचानक गाशा गुंडाळला. मध्यप्रदेशसह सर्वच ठिकाणी कंपनीच्या प्रमुखासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सीबीआयने संशयितांना अटक केली. २० मे २०१५ रोजी सांगलीतील कार्यालयही बंद झाले. सीबीआयने कंपनीच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी तब्बल चार वर्षांनंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.गुंतवणूक पाच कोटींच्या घरातजिल्ह्यातील सुमारे एक हजार लोकांनी निर्मल कंपनीत सुमारे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रथमच सांगली शहर पोलीस ठाण्यात २५ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात कंपनीविरुद्ध तक्रारी दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.