शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

थकीत ऊस बिलासाठी आज तासगावात ‘भीक मागो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

ठिय्या मारलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागतील, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. ...

ठिय्या मारलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागतील, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. खराडे म्हणाले, तासगाव व नागेवाडी या दोन कारखान्यांची १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले दिलेली आहेत. मात्र, त्यानंतर गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. ऊस गाळप होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. कायद्याने गाळपानंतर १४ दिवसांत बिल देणे बंधनकारक आहे. या प्रश्नावर स्वाभिमानीच्या वतीने तीन आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी तारखा आणि आश्वासने देण्यात आली, पण ती पाळली नाहीत. २१ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, २० जून रोजी व्यवस्थापक आर.डी. पाटील चर्चेसाठी आले. त्यावेळी त्यांनी चेक दाखविले आणि २१ जूनपासून बिल देण्यास प्रारंभ करत आहोत. त्यामुळे आंदोलन स्थगित करा, अशी विनंती केली. मात्र, बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळेच २० जुलैपासून तासगाव मार्केट यार्डातील खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास बसलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागून गुजराण करतील, भीक मागतील. मात्र, बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत, असा निर्धार केला आहे.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र माने, अशोक खाडे, दामाजी डुबल, गुलाबराव यादव, सचिन पाटील, भुजंग पाटील, संदेश पाटील, शशिकांत माने, महेश जगताप, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, धन्यकुमार पाटील, शिवाजी भोसले, सिद्धू जाधव, प्रदीप लाड, तानाजी सागर, कुंडलिक बाबर, गणेश शिंदे, सचिन महाडिक, अख्तर संडे, तानाजी धनवडे, सचिन चव्हाण, मुकेश चिंचवाडे, विनायक पवार, राहुल शेडबाले कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.