शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातही फेसबुकवरून मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांचे बनावट अकाऊंट काढून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातही फेसबुकवरून मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांचे बनावट अकाऊंट काढून पैशाची मागणी होत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या मित्राकडून फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.

सध्याच्या युगात अँड्राॅइड मोबाइलचा वापर वाढला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी मोबाइलवर संपर्क साधून एटीएम, क्रेडिट कार्डचा ओटीपी घेऊन लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार होत होते. आजही असे प्रकार सुरू आहेत. त्यात आता फसवणूक करणाऱ्यांनी नवीन फंडा अवलंबला आहे. फेसबुकवरून एखाद्या व्यक्तीचे अकाउंट हॅक करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आपल्याकडे पैशाची मागणी करणारा मेसेज येतो. आपणही कशाची खात्री न करता मित्र, मैत्रीण, नातेवाईक अडचणीत असेल म्हणून पैसे पाठवून देतो. यातून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. फेसबुकवरून दोन हजारांपासून ते २० हजारांपर्यंतची मागणी केली जाते. बहुतांश वेळा दोन ते पाच हजारांपर्यंतची रक्कम असल्याने आपणही पैसे देऊन मोकळे होतो. संबंधित मित्राकडे चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. बनावट खाते उघडून पैशाची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे.

चौकट

परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर

१. फेसबुकवर ओळखीच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. वास्तविक हा मित्र पूर्वीही आपला फ्रेंड असूनही आपण ती रिक्वेस्ट स्वीकारतो. काही वेळेनंतर पैशाच्या मागणीचा मेसेज येतो. फसवणूक करणाऱ्यांकडून हे अकाउंट हॅक केलेले असते.

२. सध्या कोरोनाकाळात मेडिकल, दवाखाना, औषधाच्या नावाखाली पैशाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

३. माझ्याकडून मित्राला पैसे फाॅरवर्ड होत नाही. तू पैसे फाॅरवर्ड कर, मी अर्ध्या तासात देतो, असेही मेसेज पाठविले जातात.

चौकट

अशी घ्या काळजी

ज्या मित्राकडून नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, त्याची स्वत: खात्री करावी. संबंधित मित्राला प्रसंगी फोन करावा. अकाउंट हॅक झाल्याची खात्री झाल्यानंतर ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच मित्राला फेसबुककडे फेक अकाउंटबाबत तक्रार करण्याची सूचना करावी.

चौकट

कोट

सायबर पोलिसांकडे पैशाच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असतात. यापूर्वी मोबाइलवरील ओटीपी घेऊन फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आता फेसबुकवरून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय कुणालाही पैसे पाठवू नयेत. फसवणूक झाल्यानंतर सायबर पोलिसांशी संपर्क करावा.

- संजय क्षीरसागर, सायबर गुन्हे विभाग प्रमुख.