शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘छावणीमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्पास सर्वोतोपरी सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST

फोटो ओळ : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपतराव पवार, ...

फोटो ओळ : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपतराव पवार, प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, डाॅ. किरण पराग, ॲड. संदेश पवार आदी उपस्थित होते.

आळसंद : जिल्ह्यात चारा टंचाईवर विविध उपाय शोधले जात आहेत. परंतु बलवडीच्या उगम फाउंडेशने लोकसहभागातून चारा टंचाईवर मात करण्यासाठी 'छावणीमुक्त महाराष्ट्र' हे अभियान हाती घेतले आहे. त्यास प्रशासकीय पातळीवर सर्वाेतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

बलवडी भा. (ता‌. खानापूर) येथील क्रांतिस्मृतीवनात उगम फाउंडेशनतर्फे ‘छावणीमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत आयोजित वैरण उत्पादन व साठवणूक प्रकल्पाचा प्रारंभ व कामगार नेते भगवानराव भिंगारदेवे प्रवेशद्वार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. चौधरी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आलो. तेव्हापासून संपतराव पवारांचे सामाजिक कार्य परिचित झाले. दुष्काळी व सुकाळी भागातील जनावरांसाठी शाश्वत चारा देणे आवश्यक आहे. यासाठी छावणीमुक्त महाराष्ट्र प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे. तो यशस्वी झाला, तर राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

संपतराव पवार म्हणाले, क्रांतिस्मृतीवनच्या माध्यमातून हाती घेतलेला प्रत्येक प्रकल्प लोकसहभागातून यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी वैरण उत्पादन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे.

यावेळी प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, भाई संपतराव पवार, सरपंच प्रवीण पवार, कलावती भिंगरादिवे उपस्थित होते. यावेळी डॉ. किरण पराग , प्रा. गोरखनाथ किर्दत यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. संदेश पवार यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. आभार प्रा. अनिल पाटील यांनी मानले.