शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

‘छावणीमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्पास सर्वोतोपरी सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST

फोटो ओळ : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपतराव पवार, ...

फोटो ओळ : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपतराव पवार, प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, डाॅ. किरण पराग, ॲड. संदेश पवार आदी उपस्थित होते.

आळसंद : जिल्ह्यात चारा टंचाईवर विविध उपाय शोधले जात आहेत. परंतु बलवडीच्या उगम फाउंडेशने लोकसहभागातून चारा टंचाईवर मात करण्यासाठी 'छावणीमुक्त महाराष्ट्र' हे अभियान हाती घेतले आहे. त्यास प्रशासकीय पातळीवर सर्वाेतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

बलवडी भा. (ता‌. खानापूर) येथील क्रांतिस्मृतीवनात उगम फाउंडेशनतर्फे ‘छावणीमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत आयोजित वैरण उत्पादन व साठवणूक प्रकल्पाचा प्रारंभ व कामगार नेते भगवानराव भिंगारदेवे प्रवेशद्वार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. चौधरी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आलो. तेव्हापासून संपतराव पवारांचे सामाजिक कार्य परिचित झाले. दुष्काळी व सुकाळी भागातील जनावरांसाठी शाश्वत चारा देणे आवश्यक आहे. यासाठी छावणीमुक्त महाराष्ट्र प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे. तो यशस्वी झाला, तर राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

संपतराव पवार म्हणाले, क्रांतिस्मृतीवनच्या माध्यमातून हाती घेतलेला प्रत्येक प्रकल्प लोकसहभागातून यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी वैरण उत्पादन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे.

यावेळी प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, भाई संपतराव पवार, सरपंच प्रवीण पवार, कलावती भिंगरादिवे उपस्थित होते. यावेळी डॉ. किरण पराग , प्रा. गोरखनाथ किर्दत यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. संदेश पवार यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. आभार प्रा. अनिल पाटील यांनी मानले.