शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

‘ई-ट्रेडिंग’चा शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:06 IST

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ...

सांगली : विदर्भातही बाजार समित्या कार्यरत असल्या तरी, त्यांची उलाढाल सांगली बाजार समितीएवढी नाही. शेतकºयांच्या विश्वासामुळेच येथील व्यवहार वाढत आहेत. त्यात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-ट्रेडिंग व ई-पेमेंट प्रणालीमुळे कृषी क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आली आहे. ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत असल्याने शेतकºयांना याचा फायदा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी येथे केले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सहकार भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभात अहिर बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. मोहनराव कदम, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अहिर पुढे म्हणाले की, काळाच्या बरोबर बदलण्यासाठी व शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. शासनाच्या ई-ट्रेडिंग, ई-पेमेंट यासारख्या पारदर्शी योजना राबविल्या जात आहेत. यामुळे थेट लाभ शेतकºयांना होत आहे.सांगली बाजार समितीच्या उलाढालीबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक नफा १८ कोटींचा व ठेवी ४५ कोटींच्या आहेत. ही गोष्ट कृषी क्षेत्रासाठी आश्वासक आहे. विदर्भात बाजार समित्यांचे जाळे असताना एकही बाजार समिती सांगलीएवढी सक्षम नाही.खा. संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली बाजार समिती हळद, बेदाणा व गुळासाठी देशभर प्रसिध्द आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाजार समितीत सचिव प्रकाश पाटील यांचे योगदान आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीला होईल.राज्यमंत्री अहिर यांच्याहस्ते सचिव प्रकाश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रम सावंत, दीपक शिंदे-म्हैसाळकर, तानाजी पाटील, जीवन पाटील, दादासाहेब कोळेकर, सुभाष खोत, दीपक शिंदे, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, वसंतराव गायकवाड, एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.शेती व्यवसाय आता प्रतिष्ठेचाअहिर म्हणाले की, पूर्वी शेती हा कमीपणाचा व्यवसाय समजला जात असे. आता मात्र, आपल्या शेतीमालाला जगभरातून मागणी आहे. तांदूळ, गहू उत्पादनात देश समृध्द झाला आहे. त्याच पध्दतीने देश तूर उत्पादनातही आघाडीवर आहे. येत्या काही दिवसात देशातील शेतीमालाला अधिक महत्त्व येणार असल्याने शेतीला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.