शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

बेळोंडगीत शेेतकरी दोन वर्षांपासून शासकीय योजनापासूून वंचित...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

संख : बेळोंडगी (ता. जत) येथे कृषी सहायक गावात येत नाहीत. बेपत्ता आहेत. दररोज उपस्थित राहण्याचा नियम असताना तालुक्यातून ...

संख : बेळोंडगी (ता. जत) येथे कृषी सहायक गावात येत नाहीत. बेपत्ता आहेत. दररोज उपस्थित राहण्याचा नियम असताना तालुक्यातून कारभार सुरू आहे. जतमध्येच समांतर कार्यालये खोलली आहेत. गावातील शेेतकरी दोन वर्षांपासून शासकीय योजनापासूून वंचित आहेत. याबाबत शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

पूर्व भागातील बेळोंडगी तालुक्यापासून ६० किलाेमीटर अंतरावर आहे. उमदी कृषी मंडलात गावाचा सामावेश आहे. गावात द्राक्ष, डाळिंब फळबागांचे प्रमाण अधिक आहे. कृषी सहायक म्हणून कोटी कार्यरत आहेत. शेततलाव, पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, ताडपत्री, शासकीय योजनांची माहिती, लाभार्थींची यादी तयार करणे आदी कामे कृषी विभागाची आहेत.

कृषी सहायक गावात येत नसल्याने कामे खोळंबून राहिली आहेत. 'कृषी सहायक दाखवा, हजार रुपये मिळावा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी सहायकांच्या हलगर्जीमुळे गावाला पाडुरंग फुंडकर फळबाग योजना, ताडपत्री, शेततलाव योजनेसह इतर योजनांचा कोणताही लाभ दोन वर्षांत मिळालेला नाही. शासकीय लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पिकांची, हंगामाची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर कोणत्याही उपाययोजना करायला पाहिजेत. याची योग्य माहिती मिळत नाही. तसेच फळबाग विमा योजनेचाही लाभ मिळालेला नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुुुकसान होत आहे.

याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष करण्यात आले आहे. तालुका कृषी विभाग पाठीशी घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.

याकडे कृषी अधिकारी यांनी लक्ष देऊन कायमस्वरूपी कृषी अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

चाैकट

गावातच वास्तव्य बंधनकारक

कृषी सहायकाने नेमणुकीच्या गावातच वास्तव्य करण्याचा नियम आहे. हा नियम पायदळी तुडवत तालुक्यात वास्तव्य करून कारभार चालवत आहेत. गावातील पीकपाणी, दुष्काळी परिस्थितीची खरी माहिती समजत नाही. शेतकऱ्यांना कामासाठी जतला जावे लागते. नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

काेट

कृषी सहायक गावात येत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव झाल्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. शासकीय लाभापासून वंचित रहावे लागत आहे. दुष्काळाबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने नुकसान होत आहे. कृषी सहायक गावात दररोज येण्याची व्यवस्था करण्यात यावी.

- सोमनिंग बोरामणी

अध्यक्ष,

विकास सर्व सेवा सहकारी सोसायटी, बेळोंडगी.