शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आधारकार्डाअभावी भिकारी, निराधारांचे कोरोना लसीकरण खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST

सांगली : कोरोनाचे लसीकरण सर्वसामान्यांसाठी खुले केल्यानंतर त्यातील तांत्रिक अडचणी पुढे येऊ लागल्या आहेत. विशेषत: ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ...

सांगली : कोरोनाचे लसीकरण सर्वसामान्यांसाठी खुले केल्यानंतर त्यातील तांत्रिक अडचणी पुढे येऊ लागल्या आहेत. विशेषत: ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशांना लसीचा लाभ मिळणार की नाही ? हा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साठ वर्षांवरील सर्व नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षांदरम्यानचे व्याधीग्रस्त लाभार्थी यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. शहरातील निराधार व भिकाऱ्यांच्या लसीकरणात ओळखपत्राची अट मुख्य अडसर ठरली आहे. एका माहितीनुसार जिल्ह्यात भिकाऱ्यांची संख्या सुमारे ८०० आहे, त्यातील अपवाद वगळता कोणाकडेच आधारकार्ड नाही. यातील अनेकजण कोरोनाग्रस्त झाले होते. उपचारानंतर बरे झाले तरी सध्या लसीपासून वंचित राहत आहेत. सरकारने लसीकरणाचा आराखडा बनविताना वंचितांचा कोणताच विचार केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना व लॉकडाऊन काळात अनेक सेवाभावी संस्था, कार्यकर्त्यांनी निराधारांना जगविले, कोरोना उपचार मिळवून दिले. त्यांच्या आधार कार्डासाठी मात्र कोणीही विचार केला नाही. आरोग्य विभागासाठीदेखील हा उत्तर नसलेला प्रश्न बनला आहे.

चौकट

आधार नाही, तर लसही नाही

- आधार नाही तर लसही नाही अशी थेट भूमिका प्रशासनाला घ्यावी लागत आहे. लसीकरणाच्या पोर्टलवर सचित्र ओळखपत्राची अट असल्याने प्रशासनाचे हात बांधले गेले आहेत.

- लसीकरण मोहीम पुढे सरकेल त्यानुसार वेगवेगळ्या अडचणी पुढे येत गेल्या, त्यामध्ये ओळखपत्राची अडचणही स्पष्ट झाली. आरोग्य विभागाने यासंदर्भात वरिष्ठ प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे.

- व्याधीग्रस्त भिकाऱ्यांचे लसीकरण झाले नाही आणि भविष्यात ते कोरोनाबाधित झाले तर समाजात सुपर स्प्रेडर म्हणून वावरण्याची भीती आहे, त्यामुळे कोरोनाचे शंभर टक्के उच्चाटन होऊ शकणार नाही.

चौकट

मिरजेत मोठ्या संख्येने भिकारी

- जिल्ह्यात सर्वाधिक भिकारी मिरज शहरात आहेत. एका माहितीनुसार येथे चारशेहून अधिक भिकारी राहतात. विस्तारीत भागातील झोपडपट्ट्यात त्यांची वस्ती आहे.

- रेल्वे जंक्शन, धार्मिक स्थळे, कर्नाटक सीमेलगतचे शहर यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढती राहिली आहे. लॉकडाऊन काळात मात्र जणू ते गायबच झाले होते.

- सांगलीतही तीनशेहून अधिक भिकारी आहेत. त्याशिवाय इस्लामपूर, विटा, तासगाव, आटपाडी येथेही निराधार भिकारी दिसतात. गेल्यावर्षी २५९ भिकाऱ्यांना त्यांच्या गावाकडे नेऊन सोडले होते, पण आता संख्या पुन्हा वाढली आहे.

कोट

महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात ५९ निराधार राहतात. या सर्वांनाच कोरोनाची बाधा झाली होती. त्यांचे लसीकरण आधार कार्डाअभावी खोळंबले आहे. तिघा-चौघांकडेच आधार कार्ड आहे, इतरांना स्वत:ची नावेदेखील माहिती नाहीत. ओळखपत्र नाही म्हणून त्यांना लस नाकारणे अन्यायकारक ठरेल. यासाठी मार्ग काढण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.

- मुस्तफा मुजावर, व्यवस्थापक, सावली निवारा केंद्र, सांगली

पॉईंटर्स

महापालिका क्षेत्रातील भिकारी - सुमारे ८००

बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्यांची संख्या - ५९

महिला १२, पुरुष ४७