शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयांत अतिदक्षता विभागातील बेड भरू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST

सांगली : कोरोनाच्या नव्या रुग्णांची दररोजची संख्या हजारापर्यंत झेपावू लागताच कोविड रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील बेडदेखील गच्च होऊ लागले आहेत. ...

सांगली : कोरोनाच्या नव्या रुग्णांची दररोजची संख्या हजारापर्यंत झेपावू लागताच कोविड रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील बेडदेखील गच्च होऊ लागले आहेत. गुरुवारअखेर जिल्हाभरात २६७ बेड शिल्लक होते. व्हेंटिलेटरची उपलब्धताही पुरेशा संख्येने नसल्याने कोरोनाबाधितांचे प्राण कंठाशी येऊ लागले आहेत.

शासकीय, खासगी व महापालिकेच्या ५० रुग्णालयांत एकूण २,५८२ बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हेंटिलेटरचे बेड फक्त ३२२ आहेत. अतिदक्षता विभागात ६६६, तर जनरल वॉर्डमध्ये १९१६ बेड आहेत. अतिदक्षता विभागातील ६६६ पैकी २६७ बेड गुरुवारी संध्याकाळपर्यंत उपलब्ध होते. जनरल वॉर्डमध्ये १,१५२ बेड रिकामे आहेत.

मिरज कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात ९८ पैकी फक्त १५ बेड रिकामे आहेत. तेथील ७५ व्हेंटिलेटरही रुग्णांच्या वापरात आहेत. जनरल वॉर्डमध्ये ६४ बेड शिल्लक आहेत. भारती रुग्णालयाच्या अतिदक्षतामध्ये फक्त दोन, तर जनरल वॉर्डमध्ये फक्त १७ बेड उपलब्ध आहेत. अन्य सर्व खासगी रुग्णालयांतही मोजकेच अतिदक्षता बेड शिल्लक आहेत.

रुग्णांच्या नातेवाइकांची सर्वाधिक मागणी व्हेंटिलेटरसाठी आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण येत आहे. मिरज कोविड रुग्णालयांत ७५ व्हेंटिलेटर बेड आहेत, उर्वरित खासगी रुग्णालयांत २४७ आहेत. मिरज रुग्णालयात व्हेंटिलेटर रिकामे नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात न्यावे लागत आहे. प्राण कंठाशी आलेल्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेईपर्यंत नातेवाइकांचाही श्वास कोंडू लागला आहे. या पळापळीत अनेकदा रुग्णांना प्राणही गमवावे लागत आहेत.

चौकट

ऑक्सिजनचा निर्णय डॉक्टरांवर सोपवा

ग्रामीण आणि शहरी भागांतूनही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी नातेवाईक आक्रमक होत असल्याचे अनुभव आहेत; पण व्हेंटिलेटरचा निर्णय नातेवाइकांनी स्वत: न घेता डॉक्टरांना घेऊ द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीण भागात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची वेळ येण्यापूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्रात न्या, तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होते, असा डॉक्टरांचा अनुभव आहे.