शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

कोविड रुग्णालयांत अतिदक्षता विभागातील बेड भरू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST

सांगली : कोरोनाच्या नव्या रुग्णांची दररोजची संख्या हजारापर्यंत झेपावू लागताच कोविड रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील बेडदेखील गच्च होऊ लागले आहेत. ...

सांगली : कोरोनाच्या नव्या रुग्णांची दररोजची संख्या हजारापर्यंत झेपावू लागताच कोविड रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील बेडदेखील गच्च होऊ लागले आहेत. गुरुवारअखेर जिल्हाभरात २६७ बेड शिल्लक होते. व्हेंटिलेटरची उपलब्धताही पुरेशा संख्येने नसल्याने कोरोनाबाधितांचे प्राण कंठाशी येऊ लागले आहेत.

शासकीय, खासगी व महापालिकेच्या ५० रुग्णालयांत एकूण २,५८२ बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हेंटिलेटरचे बेड फक्त ३२२ आहेत. अतिदक्षता विभागात ६६६, तर जनरल वॉर्डमध्ये १९१६ बेड आहेत. अतिदक्षता विभागातील ६६६ पैकी २६७ बेड गुरुवारी संध्याकाळपर्यंत उपलब्ध होते. जनरल वॉर्डमध्ये १,१५२ बेड रिकामे आहेत.

मिरज कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात ९८ पैकी फक्त १५ बेड रिकामे आहेत. तेथील ७५ व्हेंटिलेटरही रुग्णांच्या वापरात आहेत. जनरल वॉर्डमध्ये ६४ बेड शिल्लक आहेत. भारती रुग्णालयाच्या अतिदक्षतामध्ये फक्त दोन, तर जनरल वॉर्डमध्ये फक्त १७ बेड उपलब्ध आहेत. अन्य सर्व खासगी रुग्णालयांतही मोजकेच अतिदक्षता बेड शिल्लक आहेत.

रुग्णांच्या नातेवाइकांची सर्वाधिक मागणी व्हेंटिलेटरसाठी आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण येत आहे. मिरज कोविड रुग्णालयांत ७५ व्हेंटिलेटर बेड आहेत, उर्वरित खासगी रुग्णालयांत २४७ आहेत. मिरज रुग्णालयात व्हेंटिलेटर रिकामे नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात न्यावे लागत आहे. प्राण कंठाशी आलेल्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेईपर्यंत नातेवाइकांचाही श्वास कोंडू लागला आहे. या पळापळीत अनेकदा रुग्णांना प्राणही गमवावे लागत आहेत.

चौकट

ऑक्सिजनचा निर्णय डॉक्टरांवर सोपवा

ग्रामीण आणि शहरी भागांतूनही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी नातेवाईक आक्रमक होत असल्याचे अनुभव आहेत; पण व्हेंटिलेटरचा निर्णय नातेवाइकांनी स्वत: न घेता डॉक्टरांना घेऊ द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीण भागात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची वेळ येण्यापूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्रात न्या, तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होते, असा डॉक्टरांचा अनुभव आहे.