लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संसार म्हटलं की भांड्याला भांड हे लागणारच. पण यातूनच विसंवादाची दरी वाढत जात, अगदी सुखात चाललेले संसारात खडा पडतो. यावर उपाय म्हणून पोलिसांत आलेल्या व मोडेपर्यंत ताणलेल्या या संसाराला सुरळीत करण्यात पोलिसांचा भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जिल्हा पोलीस दलातील भरोसा सेलने दीड वर्षभरात १९६ संसारात समझोता करत मोडणारे संसार पुन्हा फुलवले आहेत.
घरात चारभिंतींआड झालेले वाद आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विसंवाद पोलिसांत पोहोचली की अनेकदा अडचणी येतात. मात्र, सांगली पोलीस दलातील भरोसा सेलने यावर सकारात्मक तोडगा काढण्याची भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या सूचनेनुसार समुपदेशनातून संसार पुन्हा जोडण्याचे काम सुरू आहे.
चौकट
वादाची अशीही काही भन्नाट कारणे
नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादाची कारणेही अशी वेगळी असतात. बायको तीच तीच भाजी करते यापासून ते वारंवार ती माहेरी जाते व माहेरच्या लोकांना बोलवते यातून वाद होतात.
कोट
महिला कक्षाची कामगिरी
पोलीस मुख्यालयात महिला कक्ष कार्यरत असून, याद्वारे महिलांविषयक तक्रारींची दखल घेतली जाते. यात कायदा बाजूला ठेवत नवरा-बायको दोघांना समोर बोलावून जास्तीत जास्त तोडगा काढला जातो. त्यामुळे अनेक गुंता सुटला आहे.
कोट
कुटुंबातील विसंवादामुळे अनेकवेळा संसारात अडचणी येतात. प्रकरण पोलीस, न्यायालयातही जाते. यावर तोडगा म्हणून दोघांना बोलावून घेत त्यांना समजावून सांगितले जाते. यामुळे समझोता वाढत आहे व तुटणारे संसार पुन्हा आनंदाने सुरू झाले आहेत.
सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक
चौकट
वर्षभरात महिला कक्षाकडे आलेली प्रकरणे ४१७
प्रकरणात घडवून आणला समेट १९६