शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टु बी ऑर नॉट टु बी? बारावी परीक्षेची संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या बारावी परीक्षेविषयी सर्वच स्तरावर गोंधळात गोंधळ सुरु आहे. दहावीच्या परीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या बारावी परीक्षेविषयी सर्वच स्तरावर गोंधळात गोंधळ सुरु आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ज्या तडफेने घेतला गेला, त्याच तडफेने बारावीचा निर्णय शक्य झालेला नाही. परीक्षा रद्द करण्याविषयी शिक्षणतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.

दहावीनंतर पुढील शिक्षणक्रमांच्या वाटा मर्यादित आहेत, त्यामुळे त्या परीक्षा रद्द केल्याने फारसा गदारोळ झाला नाही. बारावीच्या परीक्षेने मात्र खुद्द शिक्षणतज्ज्ञ आणि शासनाचीच जणू परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे.

राज्य शासनाचे दहावी-बारावीविषयीचे बहुतांशी निर्णय सीबीएसईच्या धर्तीवर होतात. सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने तसाच निर्णय घेतला. आता सीबीएसईने बारावी परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे राज्यातही परीक्षेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसा निर्णय जाहीर करण्यात मात्र अद्याप एकमत झालेले दिसत नाही. पण परीक्षा झाल्या पाहिजेत असा सूर शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आदी व्यावसायिक शिक्षणक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा (सीईटी) होतात, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला व गुणांना फारसे महत्व उरत नाही. पण विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा गरजेची असल्याचे शिक्षकांचे मत आहे. त्याशिवाय बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पारंपरिक शिक्षणक्रमांसाठी बारावीची गुणवत्ता यादी गृहित धरली जाते, त्यामुळेही परीक्षा आवश्यक असल्याचा सूर आहे. सर्रास महाविद्यालयांनी परीक्षा होणार असल्याचे अलिखित संदेश विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही तयारी सुरु आहे. कोरोनामुळे थेट वर्गात परीक्षा शक्य नाही, पण स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर एखाद्या स्वतंत्र केंद्रावर काटेकोर निगराणीखाली ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य असल्याकडेही शिक्षण तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

ऑनलाईन, ऑफलाईन आणि वस्तुनिष्ठतेचा पर्याय

बारावीची परीक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देता येतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शक्य आहे, त्यांनी घरातून परीक्षा द्यावी. उर्वरित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून द्यावी. बारावी नंतरचे विविध व्यावसायिक शिक्षणक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे होतात, त्यामुळे शासनाने सीईटी परीक्षादेखील तातडीने जाहीर करायला हव्यात. बारावी परीक्षेमुळे बीए, बीकॉम व बीएस्सीची प्रवेश प्रक्रियादेखील सुकर होईल.

- प्राचार्य भास्कर ताम्हणकर, सांगली

कोरोना किंवा लॉकडाऊनमुळे बारावीची परीक्षा रद्द करणे कधीही योग्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झालेच पाहिजे. असे कठीण प्रसंग भविष्यातही येऊ शकतात, त्याचीही तयारी व्हायला हवी. विद्यार्थ्यांचे वर्षभरात नियमित छोट्या परीक्षांद्वारे मूल्यमापन करता येईल. त्याद्वारे वर्षाअखेरीस विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवता येईल. बारावीची परीक्षा रद्द करण्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतरही त्या घेता येतील.

- प्राचार्य मिलिंद हुजरे, तासगाव

बारावीच्या परीक्षा झाल्या तरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत आहेत. परीक्षा जाहीर झाल्या तर

अभ्यासासाठी पुनश्च उजळणी देखील होईल. पुढील व्यावसायिक शिक्षणक्रमांसाठी बारावी हा पाया आहे, त्यामुळे परीक्षा व्हायला हव्यात.

- प्रा. पी. एम. सुतार, मणेराजुरी

विद्यार्थ्यांचे लक्ष शासन निर्णयाकडे

दहावीची परीक्षा रद्द झाली तरी बारावीच्या मात्र होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. त्यामुळे अभ्यास बंद केलेला नाही. परीक्षा झाल्या तर पुढील प्रवेशासाठी चांगले गुण मिळवता येतील, अन्यथा प्रवेश कसे होणार याची चिंता आहे. गेले वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला आहे, आता परीक्षेची घरात बसून तयारी करत आहे.

- शिवराज कोळी, विद्यार्थी, मिरज

बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे. शासनाने परीक्षा रद्द केली तरी किमान सीईटी घेतलीच पाहिजे. दहावीप्रमाणे वर्गोन्नत केल्यास हव्या त्या शाखेत प्रवेशासाठी आम्हाला धडपड करावी लागेल. त्यामुळे बारावीची परीक्षा किंवा सीईटी या पर्यायांचा विचार शासनाने केला पाहिजे.

- विकास आवटी, विद्यार्थी, तासगाव

वर्षभर ऑनलाईन वर्ग झाले, पण अभ्यास पुरेसा झालेला नाही. परीक्षेविषयी निश्चित निर्णय होत नसल्याने आम्हीही गोंधळात आहोत. बारावीनंतर बीएस्सीला प्रवेश घेणार आहे, त्यामुळे अभ्यास थांबवलेला नाही. परीक्षा झाली पाहिजे, पण त्यासाठी पुरेसा वेळ देऊनच वेळापत्रक जाहीर करावे.

- कोमल व्यवहारे, विद्यार्थिनी, मिरज

पॉईंटर्स

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी

३३,०९०

मुली १४,५०५

मुले - १८, ५८५