शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सावधान..! रसायनांव्दारे पिकवून फळांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

संख : अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष, ग्राहकांचे अज्ञान यामुळे जत शहरात, ग्रामीण भागात फिरुन घातक रसायने वापरून ...

संख : अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष, ग्राहकांचे अज्ञान यामुळे जत शहरात, ग्रामीण भागात फिरुन घातक रसायने वापरून पिकविलेल्या आंबा, केळी, चिकू या फळांची विक्री सुरू आहे. पैसे देऊन विकतचे दुखणे घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे.

कोरोनाच्या संकटात व 'फिट अँड फाईन' राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळे फायदेशीर आहेत. फळांना सध्या मोठी मागणी आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कच्ची केळी, आंबा, चिकू खरेदी करतात.

झाडावरून तोडलेले फळ नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी १२ ते १५ दिवस लागतात. मात्र व्यापारी त्वरित नफा कमविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड, इथरेस, इक्रॉन यासारख्या घातक रसायनांचा वापर करून फळे पिकवितात. फळांच्या पेटीत, करंडीत, ट्रेमध्ये कॅल्शिअम कार्बाईडच्या पुड्या ठेवतात. इथरेस, इक्रॉनचे गुलाबी, पांढरे, रंगहीन द्रावण करून फळांना बारीक ठिपके लावले जातात.

कार्बाईडचा वापर वेल्डिंग कामासाठी केला जातो. त्याच्या वापरामुळे फळांच्या पेटीची उष्णता वाढून फळे वेळेच्या आधीच पिकतात. फळाला पिवळा रंग येतो. चकाकी येते. ग्राहक जादा पैसे देऊन ती खरेदी करतात.

विक्रेता ग्राहकाला नमुना म्हणून नैसर्गिकरित्या पिकविलेल्या फळाची फोड कापून खायला देतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास पटतो.

वास्तविक या रसायनांमुळे फळांमधले नैसर्गिक सत्व कमी होते व ते फळ विषारी बनते.

आंबे पाडाला आल्यानंतर तोडून गव्हाचे काड, चगाळा, पाला-पाचोळा यांच्यात झाकून ठेवतात. केळीचा घड परिपक्व झाल्यावर काढला जातो. फण्या वेगळ्या करून करंडीत ठेवल्या जातात. तसेच चिकूही परिपक्व झाल्यावर झाडावरून तोडून पोत्यावर, पाटीत ठेवून नैसर्गिकरित्या पिकविले जातात. व्यापारी नफेखोरीचा विचार करून फळे नैसर्गिकरित्या पिकवित नाहीत.

चौकट

ग्राहक हो, काळजी घ्या

फळांमधील कार्बाईडच्या अंशामुळे शरीरात इथिलीन नावाचा गॅस तयार होतो. त्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग, डोकेदुखी, अपचन, पोटाची जळजळ, जुलाब, उलट्या यासारख्या तक्रारी वाढतात. तसेच शरीरात इथिलीन गॅसमुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे.

ओळखण्याचे साधनच नाही

बाजारातून विकत घेतलेले फळ नैसर्गिकरित्या पिकलेले आहे की कृत्रिमरित्या पिकविलेले आहे, हे शोधण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. प्रयोगशाळेत त्याचे परीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे मुजोर झालेले फळविक्रेते ग्राहकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.

याकडे अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.