शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

इस्लामपुरात कोलमडलेल्या कॉँग्रेसला नेत्यांचा आधार

By admin | Updated: September 9, 2016 01:14 IST

आगामी निवडणुकांवर लक्ष : राष्ट्रवादीच्या वटवृक्षाखाली वाढ खुंटली

अशोक पाटील --इस्लामपूर --वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी फोफावली आहे. मात्र इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या वटवृक्षामुळे काँग्रेसची वाढ खुंटली आहे. तथापि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते इस्लामपुरातील कार्यकर्त्यांना आधार देण्यास सरसावले आहेत.वाळवा व शिराळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पेठनाक्यावरून काँग्रेसचा रथ हाकला जात होता, परंतु काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी राष्ट्रवादीला हाताशी धरून कुरघोड्या करत पेठनाक्यावरील काँग्रेस संपुष्टात आणली आहे. तेव्हापासून वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात काँग्रेसला खमके नेतृत्व लाभलेले नाही. तालुका पातळीवर सी. बी. पाटील (कामेरी), बाळासाहेब पाटील (साखराळे), जितेंद्र पाटील (बोरगाव), आनंदराव पाटील (येडेनिपाणी), वैभव पवार, विजय पवार (इस्लामपूर) यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या यादीत नाव घेण्यासारखा नेता उरलेला नाही. आता यांना बळकटी देण्यासाठी जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील सरसावले आहेत.गेल्या पाच वर्षात शहरात सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही प्रश्न काँग्रेसने सोडविलेले नाहीत. तालुक्यातील काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे.दिग्गजांचा रामरामआमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, डॉ. प्रताप पाटील, अभिजित पाटील यांनी काँग्रेस वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु शिराळा तालुक्यात दोन शिवाजीराव एका म्यानात राहू शकले नाहीत. याचा फटका शिवाजीराव नाईक यांना बसला. त्यांनी काँग्रेस सोडून विकास आघाडी स्थापन केली. काँग्रेसमधील गटबाजीमुळे या सर्व नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याने इस्लामपूर पालिका निवडणुकीतही काँग्रेस उतरणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या नवख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. - जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, बोरगाव