शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साखरेची आधारभूत किंमत वाढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : यंदा साखरेला आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात मागणी असल्याने एकही किलो साखर स्थानिक बाजारपेठेत विकली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: यंदा साखरेला आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात मागणी असल्याने एकही किलो साखर स्थानिक बाजारपेठेत विकली गेली नाही. यामुळे केंद्र शासनाने ३ हजार ५०० रुपये साखरेची आधारभूत किंमत करावी. तसेच व्यापाऱ्यांनी या किमतीपेक्षा जास्त दराने साखर खरेदीची व्यवस्था करावी, अन्यथा साखर उद्योग कर्ज व व्याजाने अडचणीत येईल, अशी भीती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ५० व्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘प्रचिती’चे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार नाईक म्हणाले की, सध्याच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापारी साखर मागत आहेत. त्यामुळे एकही किलो साखर बाजारपेठेत विकली नाही. मात्र, देशात सर्वांत जास्त दराने म्हणजे २ हजार ६६१ रुपये दराने साखर विश्वास कारखान्याने निर्यात केली. त्यास ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच ६० हजार क्विंटल कच्ची साखर व स्पिरीटचे जादा उत्पादन केल्याने ऊस उत्पादकांना पैसे देऊ शकलो.

यावेळी दिनकर पाटील, विजयराव नलवडे, सम्राटसिंह नाईक, विवेक नाईक, सुरेशराव चव्हाण, विश्वास कदम, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, सचिन पाटील, भानुदास पाटील, दिनकर महिंद, विठ्ठल चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व नोटीस वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. आभार हंबीरराव पाटील यांनी मानले.

चाैकट

शिल्लक साखरेमुळे अडचण

गतवर्षीची २.२४ लाख व यंदा ८.०२ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. हीच परिस्थिती सर्वच कारखान्यांची आहे. या शिल्लक साखरेचे कर्ज व व्याज याचा बोजा वाढत आहे. यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून विश्वास साखर कारखान्यामार्फत ऊस रसापासून इथेनॉल निर्मिती व सहवीजनिर्मिती प्रकल्प क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.