शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

साखरेची आधारभूत किंमत वाढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : यंदा साखरेला आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात मागणी असल्याने एकही किलो साखर स्थानिक बाजारपेठेत विकली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: यंदा साखरेला आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात मागणी असल्याने एकही किलो साखर स्थानिक बाजारपेठेत विकली गेली नाही. यामुळे केंद्र शासनाने ३ हजार ५०० रुपये साखरेची आधारभूत किंमत करावी. तसेच व्यापाऱ्यांनी या किमतीपेक्षा जास्त दराने साखर खरेदीची व्यवस्था करावी, अन्यथा साखर उद्योग कर्ज व व्याजाने अडचणीत येईल, अशी भीती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ५० व्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘प्रचिती’चे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार नाईक म्हणाले की, सध्याच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापारी साखर मागत आहेत. त्यामुळे एकही किलो साखर बाजारपेठेत विकली नाही. मात्र, देशात सर्वांत जास्त दराने म्हणजे २ हजार ६६१ रुपये दराने साखर विश्वास कारखान्याने निर्यात केली. त्यास ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच ६० हजार क्विंटल कच्ची साखर व स्पिरीटचे जादा उत्पादन केल्याने ऊस उत्पादकांना पैसे देऊ शकलो.

यावेळी दिनकर पाटील, विजयराव नलवडे, सम्राटसिंह नाईक, विवेक नाईक, सुरेशराव चव्हाण, विश्वास कदम, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, सचिन पाटील, भानुदास पाटील, दिनकर महिंद, विठ्ठल चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व नोटीस वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. आभार हंबीरराव पाटील यांनी मानले.

चाैकट

शिल्लक साखरेमुळे अडचण

गतवर्षीची २.२४ लाख व यंदा ८.०२ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. हीच परिस्थिती सर्वच कारखान्यांची आहे. या शिल्लक साखरेचे कर्ज व व्याज याचा बोजा वाढत आहे. यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून विश्वास साखर कारखान्यामार्फत ऊस रसापासून इथेनॉल निर्मिती व सहवीजनिर्मिती प्रकल्प क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.