शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बसाप्पाचीवाडी तलावप्रश्नी पाच गावांचा आक्रमक पवित्रा

By admin | Updated: January 19, 2015 00:29 IST

संघर्ष समिती स्थापन : पोलिसांच्या चौकशीची मागणी

कवठेमहांकाळ : बसाप्पाचीवाडी तलावाच्या पाणीप्रश्नी कवठेमहांकाळ तालुक्यात संघर्ष उफाळला असून, बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे अंकले, कोकळे, इरळी, मोघमवाडी या पाच गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीला विराट सभेचे स्वरूप आले होते. तलावातील पाण्याचा एकही थेंब उचलू न देण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी बसाप्पाचीवाडी तलाव बचाव पाणी संघर्ष समितीची शेतकऱ्यांनी स्थापना केली.डफळापूर पाणी योजनेवरून गेल्या महिन्यापासून कवठेमहांकाळ व जत या दोन तालुक्यातील बसाप्पाचीवाडी व डफळापूर या दोन गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून संघर्ष टोकाला गेला आहे. यामध्ये डफळापूरकरांनी अनेकवेळा काम सुरू केले, परंतु बसाप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. या पाणी प्रश्नाकडे प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, तर कवठेमहांकाळ पोलिसांनी डफळापूरकरांच्या चिथावणीमुळे बसाप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला. पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने पाणीप्रश्नी कितीही संघर्ष झाला तरी चालेल, परंतु पाण्याचा एक थेंबही डफळापूरकरांना द्यायचा नाही, असा ठराव संमत केला.या तलावातील पाणी आमच्या हक्काचे आहे. इथे बाहेरून येऊन कुणी प्रशासनाला हाताशी धरून पाणी उचलण्याचा प्रयत्न करीत असतील तर, तो प्रयत्न हाणून पाडण्याचा इशाराही बैठकीत दिला. पाच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत बसाप्पाचीवाडी तलाव बचाव पाणी संघर्ष समितीची स्थापनाही केली आहे. बैठकीसाठी दिलीप लोखंडे, गजानन ओलेकर, सुऱ्याबा गोयकर, गजानन भडके, संजय भडके, रंगराव माने, सुभाष माने, सुधाकर खरात, शिवाजी पाटील, गंगाधर माळी, प्रकाश कोळेकर यांच्यासह चारशे ते पाचशे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)डफळापूर गावासाठी किती पाणी योजना शासनामार्फत मंजूर करण्यात आल्या, त्यांची आता काय अवस्था आहे, या योजनांवर किती खर्च करण्यात आला? डफळापूरजवळ बाज गावातील तलाव केवळ अडीच कि.मी.वर असताना १३ कि.मी. असणाऱ्या बसाप्पाचीवाडी तलावातील पाणी का उचलण्याचा हट्ट राजकीय नेत्यांनी धरला आहे?, असे सवाल उपस्थित करण्यात आले. योजनांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची व राजकीय नेत्यांची चौकशी करावी. पाणीप्रश्न न्यायप्रविष्ट असूनही पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे, असे ठराव या बैठकीत घेण्यात आले.