शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

बसाप्पाचीवाडी तलावप्रश्नी पाच गावांचा आक्रमक पवित्रा

By admin | Updated: January 19, 2015 00:29 IST

संघर्ष समिती स्थापन : पोलिसांच्या चौकशीची मागणी

कवठेमहांकाळ : बसाप्पाचीवाडी तलावाच्या पाणीप्रश्नी कवठेमहांकाळ तालुक्यात संघर्ष उफाळला असून, बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे अंकले, कोकळे, इरळी, मोघमवाडी या पाच गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीला विराट सभेचे स्वरूप आले होते. तलावातील पाण्याचा एकही थेंब उचलू न देण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी बसाप्पाचीवाडी तलाव बचाव पाणी संघर्ष समितीची शेतकऱ्यांनी स्थापना केली.डफळापूर पाणी योजनेवरून गेल्या महिन्यापासून कवठेमहांकाळ व जत या दोन तालुक्यातील बसाप्पाचीवाडी व डफळापूर या दोन गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून संघर्ष टोकाला गेला आहे. यामध्ये डफळापूरकरांनी अनेकवेळा काम सुरू केले, परंतु बसाप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. या पाणी प्रश्नाकडे प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, तर कवठेमहांकाळ पोलिसांनी डफळापूरकरांच्या चिथावणीमुळे बसाप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला. पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने पाणीप्रश्नी कितीही संघर्ष झाला तरी चालेल, परंतु पाण्याचा एक थेंबही डफळापूरकरांना द्यायचा नाही, असा ठराव संमत केला.या तलावातील पाणी आमच्या हक्काचे आहे. इथे बाहेरून येऊन कुणी प्रशासनाला हाताशी धरून पाणी उचलण्याचा प्रयत्न करीत असतील तर, तो प्रयत्न हाणून पाडण्याचा इशाराही बैठकीत दिला. पाच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत बसाप्पाचीवाडी तलाव बचाव पाणी संघर्ष समितीची स्थापनाही केली आहे. बैठकीसाठी दिलीप लोखंडे, गजानन ओलेकर, सुऱ्याबा गोयकर, गजानन भडके, संजय भडके, रंगराव माने, सुभाष माने, सुधाकर खरात, शिवाजी पाटील, गंगाधर माळी, प्रकाश कोळेकर यांच्यासह चारशे ते पाचशे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)डफळापूर गावासाठी किती पाणी योजना शासनामार्फत मंजूर करण्यात आल्या, त्यांची आता काय अवस्था आहे, या योजनांवर किती खर्च करण्यात आला? डफळापूरजवळ बाज गावातील तलाव केवळ अडीच कि.मी.वर असताना १३ कि.मी. असणाऱ्या बसाप्पाचीवाडी तलावातील पाणी का उचलण्याचा हट्ट राजकीय नेत्यांनी धरला आहे?, असे सवाल उपस्थित करण्यात आले. योजनांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची व राजकीय नेत्यांची चौकशी करावी. पाणीप्रश्न न्यायप्रविष्ट असूनही पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे, असे ठराव या बैठकीत घेण्यात आले.