शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बसाप्पाचीवाडी-डफळापुरात पाणीप्रश्नावरून संघर्ष पेटला

By admin | Updated: January 14, 2015 23:19 IST

समझोत्याची गरज : सहा दिवसात दोन वेळा काम बंद

डफळापूर : डफळापूर (ता. जत) राष्ट्रीय पेयजल योजनेत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. ही योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांचा होत असलेला तीव्र विरोध, कवठेमहांकाळ पोलिसांची बघ्याची भूमिका, बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज, तसेच डफळापूर ग्रामस्थांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता असताना, दोन्ही गावात संघर्ष वाढतच चालला आहे.डफळापूरसाठी २0११ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून बसाप्पाचीवाडी तलावातून नळपाणी पुरवठा योजनेसाठी साडेसात कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. या योजनेला निधी देण्यास शासनाने सुरुवातीपासून टाळाटाळ केली. असे असताना ठेकेदाराने आतापर्यंत पावणेतीन कोटीची कामे केली आहेत. गेल्या आठवड्यात डफळापूर योजनेचे काम बसाप्पाचीवाडी तलावात पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. सहा दिवसात दोन वेळा बसाप्पाचीवाडी येथील काही ग्रामस्थांनी काम बंद पाडले. डफळापूर योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थ विरोध करीत आहेत. डफळापूरकरांची तहान भागविण्यासाठी बसाप्पाचीवाडी गावच्या ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. डफळापूर योजनेतून पाणी गाव व वाडी-वस्तीसाठी जात नसून ते पाणी शेतीसाठी जात असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. दोन्ही गावांचा संघर्ष विकोपाला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)दोन संशयित ताब्यातडफळापूर पाणी योजनेचे काम बंद पाडणाऱ्या बसाप्पाच्यावाडी येथील भारत ज्ञानदेव ओलेकर व दिलीप विलास लोखंडे यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी आज (बुधवारी) ताब्यात घेतले. अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.