शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

‘वाकुर्डे’चा कालवा फुटला

By admin | Updated: July 24, 2014 23:10 IST

मानकरवाडीतील घटना : दहाजणांचे प्राण प्रसंगावधानामुळे बचावले

शिराळा : मानकरवाडी (ता. शिराळा) येथे वाकुर्डे योजनेचा कालवा फुटून पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने पन्नास एकर जमीन वाहून गेली. अचानक पाणी आल्याने शेतात काम करणाऱ्या सुमारे दहाजणांचे प्राण प्रसंगावधानामुळे बचावले. हा प्रकार काल (बुधवारी) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडला. वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचा एक कालवा वाकुर्डेकडून शिरसीकडे डोंगरास वळसा घालून जातो. तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळे या कालव्यातून तसेच डोंगरावरून प्रचंड वेगाने पाणी वहात या कालव्यात आल्याने मानकरवाडी गावाजवळील कालव्यास भगदाड पडले. या कालव्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडले. बबन नांगरे, मंगेश चव्हाण या युवकांनी पोती टाकून सुरूवातीस भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जोरदार असल्याने हे युवक कसेबसे जीव वाचवून बाजूला झाले. शेतात काम करणारे शेतकरीही आरडाओरडा करीत बाजूला झाले. या भगदाड पडलेल्या कालव्यापासून सुमारे एक किलोमीटरवर अंत्री-मानकरवाडी मध्यम प्रकल्प आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची शेती पाण्याने वाहून गेली, तर काहींच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठले. यादरम्यान असणाऱ्या रस्त्याचेही नुकसान झाले. कालव्यापासून रस्त्यापर्यंत असणारी जवळजवळ पन्नास एकर क्षेत्रातील माती, पिके, बांध वाहून गेले. बबन आनंदा नांगरे (आठ एकर), गजानन म्होप्रेकर, नंदाताई सुरेंद्र चव्हाण, मंगेश सुरेंद्र चव्हाण, जितेंद्र चव्हाण, मीरा चव्हाण, (सर्व रा. मानकरवाडी) यांची प्रत्येकी दोन एकर, शामराव जाधव, मारुती जाधव, संजय जाधव, (सर्व रा. आंबेवाडी), सुनील पाटील (रा. शिरशी), एकनाथ धुमाळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या शेतीची पूर्ण माती वाहून गेली. सुभाष म्होप्रेकर यांचे जवळजवळ ७० बाय ६० फूट आकाराचे तळेच या मातीने व पाण्याने भरले गेले. या पाण्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या फुटलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे अंत्री-करमजाई धरण अवघ्या चार तासात भरले व धरणाच्या सांडव्यातून पाणीही बाहेर पडले. (वार्ताहर)