शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

वारणा काठावर महापुरातील ऊस झाला जनावरांचा चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST

कुरळप : जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या महापुराने सर्वात जास्त ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. या उसाचा सध्या ...

कुरळप : जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या महापुराने सर्वात जास्त ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. या उसाचा सध्या जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत झाले आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील वारणा काठावरील शेतकरी सध्या चिंतेत दिसून येत आहे.

२०१९ व २०२१ अशी दोन वर्षे वारणा नदीला आलेल्या महापुराने या परिसरातील ऊस शेती उद्ध्वस्त झाली आहे. ऊस शेतीवर या परिसरातील आर्थिक गणित अवलंबून आहे. त्यामुळे ऊस शेतीला उत्पादकांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. हेच उसाचे गणित कोलमडून पडल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. दोनवेळच्या महापुराने येथील ऊस शेती पूर्णत: तोट्यात सुरू असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ऐतवडे खुर्द येथे महापुराने जवळपास ६५० हेक्टर ऊस शेती पूरबाधित झाली आहे. अनेक ऊस उत्पादक पुरात बुडालेला ऊस जनावरांना चारा म्हणून घालत आहेत. उसाची लागण करताना बी-बियाणे, औषधे, महागडी खते, शेतीची मशागत, आदी खर्च काढला, तर एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. महापुरात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या डोळ्यात आता अश्रू तरळत आहेत.

शासनाने जाहीर केलेली नुकसानग्रस्त पंचनाम्याची मदतही तोकडीच आहे. महापुरातून बचावलेल्या उसाला साखर कारखान्यांकडून मिळणारा अवाजवी दर व खर्चाचा हिशेब केला, तर ऊसशेती पूर्णतः तोट्यात असल्याचे चित्र दिसत आहे.