शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाल्याने आता शेतकऱ्यांवर बँका मेहरबान झाल्या असून, जिल्ह्यात डिसेंबरअखेर उद्दिष्टापैकी ६० टक्के ...

सांगली : जिल्ह्यात साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाल्याने आता शेतकऱ्यांवर बँका मेहरबान झाल्या असून, जिल्ह्यात डिसेंबरअखेर उद्दिष्टापैकी ६० टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा बहर फुलणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कर्जमाफी जिल्हा बँकेने दिली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जवाटपाचे प्रमाण कमी असल्याने त्यांची कर्जमाफीही कमी आहे. तरीही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अशा शेतकऱ्यांना मुक्त हस्ते कर्जवाटप करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अडथळे आले होते. तेही दूर झाले आहेत.

चाैकट

पीक कर्जाची आकडेवारी आकडे कोटीत

वर्ष उद्दिष्ट वाटप टक्के

२०१६-१७ १८२० १८४३ १०१

२०१७-१८ २०३० १३६० ६७

२०१८-१९ २१०० १४५८ ६९

२०१९-२० २४१७ १३७३ ५७

२०२०-२१ २५९५ १५६३ ६० (डिसेंबर २०२० पर्यंत)

कोट

जिल्ह्यात सध्या पीक कर्जवाटपाचे प्रमाण चांगले आहे. डिसेंबरपर्यंत ६० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, मार्चअखेर शंभर टक्के होण्याची शक्यता आहे.

डी. व्ही. जाधव, मुख्य प्रबंधक, अग्रणी बँक सांगली

कोट

कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर लगेचच नव्या पिकासाठी प्रस्ताव दिल्यानंतर कर्ज मंजूर झाले. पूर्वीच्या याेजनेपेक्षा ही योजना सुलभ होती. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून दिलासा मिळाला आहे.

-नितीन पाटील, इस्लामपूर

कोट

कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही. तांत्रिक कोणत्या कारणात्सव कर्जमाफी मिळाली नाही, हे कळाले नाही. त्यामुळे नव्या कर्जासाठी अर्जही केला नाही.

-मधुकर देसाई, सावळज

मिळालेली कर्जमाफी जिल्हा बँकेकडील

६२,६५५ शेतकरी

कर्जमाफी ३४१ कोटी १४ लाख ६६ हजार