शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

बाळकृष्णकाका पाटील : अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

वारणा खोऱ्यात काकांची धाडसी व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख होती. वयाच्या अठराव्यावर्षी सातारा लोकल बोर्डाची निवडणूक लढवून माजी ...

वारणा खोऱ्यात काकांची धाडसी व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख होती. वयाच्या अठराव्यावर्षी सातारा लोकल बोर्डाची निवडणूक लढवून माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पॅनेलमधून विजयी झाले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे, बॅ. जी. डी. पाटील, खा. एस. डी. पाटील, छगनबापू पाटील, एम. डी. पवार साहेब यांच्याशी त्यांचे राजकीय मैत्रीपूर्ण संबंध होते. तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री व माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिगाव (ता. वाळवा) येथे ‘अखिल भारतीय काँग्रेस चिरायू होवो’ ही घोषणा देऊन वारणा शेतकरी परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीवरील भव्य पुलाच्या मागणीचा ठराव केला. बाळासाहेब देसाई यांच्याकडे आग्रही भूमिका घेऊन ताे लोकल बोर्डातून मंजूर करून घेतला. आष्टा-शिगाव खडीचा रस्ता मंजूर करून घेतला. १९७२ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत आपल्या विहिरीवरून पाण्याचे हौद बांधून गावाला पिण्याचे पाणी स्वखर्चाने खुले केले. वारणा साखर कारखान्याच्या माध्यमातून व लोकल बोर्डाच्या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. काकांचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. गावातील गोरगरीब सर्व समाजातील लोकांना काकांनी कायम मदतीचा हात दिला. १९६२ मध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवारी तिकीट यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील यांनी काकांना काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर केले होते. मात्र काकांनी मोठ्या मनाने ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे यांना तिकीट देऊन सहकार्य केले.

चांदोली धरण होण्याच्या आधी शिगाव येथील वारणा नदीवर शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर टाईप (केटी वेअर) मजबूत धरण उभारण्यात तात्यासाहेब कोरे व काकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. रघुनाथ श्रीपती पाटील, रामचंद्र वायचळ, गणपतराव चव्हाण, भीमराव पाटील, विठ्ठल गांधी, सरपंच आनंदराव पाटील, ज्ञानू बांडे (गुरुजी), बळवंत देसाई, मुबारक इनामदार, रामचंद्र देसाई, रघुनाथ पाटील हे काकांचे गावातील विकास कामांतील जुने सहकारी होते. काकांनी गावात अनेक सामाजिक संस्थांची उभारणी केली. काकांचा पंचक्रोशीत वेगळा दरारा होता. काकांच्या पश्चात आज त्यांच्या मुलांनी व सर्व कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचा वारसा उत्तमपणे सुरू ठेवला आहे. काकांच्या नावाने गावांमध्ये विविध संस्था, शिक्षण संस्था स्थापन करून त्या उत्तमप्रकारे चालविल्या आहेत. आज काकांचा स्मृतिदिन... त्यांना कोटी कोटी प्रणाम!

संकलन : प्रा. तानाजी बांडे

शब्दांकन : विनोद पाटील

फाेटाे : १६ बाळकृष्ण पाटील