शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

बाळकृष्णकाका पाटील : अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

वारणा खोऱ्यात काकांची धाडसी व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख होती. वयाच्या अठराव्यावर्षी सातारा लोकल बोर्डाची निवडणूक लढवून माजी ...

वारणा खोऱ्यात काकांची धाडसी व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख होती. वयाच्या अठराव्यावर्षी सातारा लोकल बोर्डाची निवडणूक लढवून माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पॅनेलमधून विजयी झाले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे, बॅ. जी. डी. पाटील, खा. एस. डी. पाटील, छगनबापू पाटील, एम. डी. पवार साहेब यांच्याशी त्यांचे राजकीय मैत्रीपूर्ण संबंध होते. तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री व माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिगाव (ता. वाळवा) येथे ‘अखिल भारतीय काँग्रेस चिरायू होवो’ ही घोषणा देऊन वारणा शेतकरी परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीवरील भव्य पुलाच्या मागणीचा ठराव केला. बाळासाहेब देसाई यांच्याकडे आग्रही भूमिका घेऊन ताे लोकल बोर्डातून मंजूर करून घेतला. आष्टा-शिगाव खडीचा रस्ता मंजूर करून घेतला. १९७२ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत आपल्या विहिरीवरून पाण्याचे हौद बांधून गावाला पिण्याचे पाणी स्वखर्चाने खुले केले. वारणा साखर कारखान्याच्या माध्यमातून व लोकल बोर्डाच्या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. काकांचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. गावातील गोरगरीब सर्व समाजातील लोकांना काकांनी कायम मदतीचा हात दिला. १९६२ मध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवारी तिकीट यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील यांनी काकांना काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर केले होते. मात्र काकांनी मोठ्या मनाने ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे यांना तिकीट देऊन सहकार्य केले.

चांदोली धरण होण्याच्या आधी शिगाव येथील वारणा नदीवर शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर टाईप (केटी वेअर) मजबूत धरण उभारण्यात तात्यासाहेब कोरे व काकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. रघुनाथ श्रीपती पाटील, रामचंद्र वायचळ, गणपतराव चव्हाण, भीमराव पाटील, विठ्ठल गांधी, सरपंच आनंदराव पाटील, ज्ञानू बांडे (गुरुजी), बळवंत देसाई, मुबारक इनामदार, रामचंद्र देसाई, रघुनाथ पाटील हे काकांचे गावातील विकास कामांतील जुने सहकारी होते. काकांनी गावात अनेक सामाजिक संस्थांची उभारणी केली. काकांचा पंचक्रोशीत वेगळा दरारा होता. काकांच्या पश्चात आज त्यांच्या मुलांनी व सर्व कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचा वारसा उत्तमपणे सुरू ठेवला आहे. काकांच्या नावाने गावांमध्ये विविध संस्था, शिक्षण संस्था स्थापन करून त्या उत्तमप्रकारे चालविल्या आहेत. आज काकांचा स्मृतिदिन... त्यांना कोटी कोटी प्रणाम!

संकलन : प्रा. तानाजी बांडे

शब्दांकन : विनोद पाटील

फाेटाे : १६ बाळकृष्ण पाटील