शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

बिकट काळातील संतुलित अर्थसंकल्प : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

कडेगाव : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या अतिशय बिकट काळातही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा संतुलित अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर ...

कडेगाव :

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या अतिशय बिकट काळातही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा संतुलित अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीशी लढा देताना कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. तसेच आरोग्य व्यवस्था अधिक सदृढ करायची गरज देखील अधोरेखित झाली आहे. या दोन्ही घटकांना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सार्थ प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी भरीव तरतूद केली आहे.

कृषी क्षेत्रासाठी तरतुदींमध्ये ११.७ टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. कृषी मालाला अधिकाधिक भाव देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून ‘एपीएमसी’ बळकटीकरणाला दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील कृषी महाविद्यालयांमधील संशोधनासाठी देखील प्रतिवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खेडोपाडी शिक्षणासाठी एसटी बसचा वापर करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत मोफत एसटी सेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरी परिसरात रिंग रोड, उड्डाणपूल अशा आधुनिक दळणवळणाच्या सेवादेखील विस्तारण्यात येणार आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क विकसित करणार आहे. पुढील पिढी घडविण्यासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. ऊस तोडणी कामगार त्याचप्रमाणे घरेलू कामगार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. सामाजिक न्याय आणि हिताचे रक्षण करण्यासाठी कल्याणकारी योजना सादर केल्या आहेत.