शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

बिकट काळातील संतुलित अर्थसंकल्प : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

कडेगाव : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या अतिशय बिकट काळातही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा संतुलित अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर ...

कडेगाव :

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या अतिशय बिकट काळातही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा संतुलित अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीशी लढा देताना कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. तसेच आरोग्य व्यवस्था अधिक सदृढ करायची गरज देखील अधोरेखित झाली आहे. या दोन्ही घटकांना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सार्थ प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी भरीव तरतूद केली आहे.

कृषी क्षेत्रासाठी तरतुदींमध्ये ११.७ टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. कृषी मालाला अधिकाधिक भाव देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून ‘एपीएमसी’ बळकटीकरणाला दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील कृषी महाविद्यालयांमधील संशोधनासाठी देखील प्रतिवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खेडोपाडी शिक्षणासाठी एसटी बसचा वापर करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत मोफत एसटी सेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरी परिसरात रिंग रोड, उड्डाणपूल अशा आधुनिक दळणवळणाच्या सेवादेखील विस्तारण्यात येणार आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क विकसित करणार आहे. पुढील पिढी घडविण्यासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. ऊस तोडणी कामगार त्याचप्रमाणे घरेलू कामगार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. सामाजिक न्याय आणि हिताचे रक्षण करण्यासाठी कल्याणकारी योजना सादर केल्या आहेत.