शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बहिर्जी नाईक स्वराज्याचे महानायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक ...

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक बहिर्जी नाईक होते. बुद्धिचातुर्य, स्वामीनिष्ठा आणि प्रखर राष्ट्रप्रेम असलेले बहिर्जी आमच्या राजकारणाचा विषय होऊ शकत नाहीत. त्यांचे स्मारक झाले म्हणजे विषय संपत नाही. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळेच ते स्वराज्याचे महानायक आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बाणूरगड (ता. खानापूर) येथे फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाले. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, आ. पडळकर यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून शासनाला सादर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला. परंतु, ज्यांना जमले नाही ते काम आ. पडळकर यांनी केले. त्यामुळेच ही लढाई प्रस्थापित विरोधी विस्थापित अशी आहे.

आ. पडळकर म्हणाले, हे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल.

जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मोहन रणदिवे, अरुण बालटे, भूमिका बेरगळ, तानाजी यमगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, सुहास पाटील, सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताबाई गायकवाड, दादासाहेब मरगळे, नेताजी पाटील उपस्थित होते.

फोटो - २००७२०२१-विटा-बाणूरगड : बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, प्राजक्ता कोरे, शिवाजी डोंगरे, ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.