शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बहिर्जी नाईक स्वराज्याचे महानायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक ...

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक बहिर्जी नाईक होते. बुद्धिचातुर्य, स्वामीनिष्ठा आणि प्रखर राष्ट्रप्रेम असलेले बहिर्जी आमच्या राजकारणाचा विषय होऊ शकत नाहीत. त्यांचे स्मारक झाले म्हणजे विषय संपत नाही. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळेच ते स्वराज्याचे महानायक आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बाणूरगड (ता. खानापूर) येथे फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाले. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, आ. पडळकर यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून शासनाला सादर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला. परंतु, ज्यांना जमले नाही ते काम आ. पडळकर यांनी केले. त्यामुळेच ही लढाई प्रस्थापित विरोधी विस्थापित अशी आहे.

आ. पडळकर म्हणाले, हे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल.

जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मोहन रणदिवे, अरुण बालटे, भूमिका बेरगळ, तानाजी यमगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, सुहास पाटील, सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताबाई गायकवाड, दादासाहेब मरगळे, नेताजी पाटील उपस्थित होते.

फोटो - २००७२०२१-विटा-बाणूरगड : बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, प्राजक्ता कोरे, शिवाजी डोंगरे, ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.