शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

बहिर्जी नाईक स्वराज्याचे महानायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक ...

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक बहिर्जी नाईक होते. बुद्धिचातुर्य, स्वामीनिष्ठा आणि प्रखर राष्ट्रप्रेम असलेले बहिर्जी आमच्या राजकारणाचा विषय होऊ शकत नाहीत. त्यांचे स्मारक झाले म्हणजे विषय संपत नाही. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळेच ते स्वराज्याचे महानायक आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बाणूरगड (ता. खानापूर) येथे फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाले. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, आ. पडळकर यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून शासनाला सादर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला. परंतु, ज्यांना जमले नाही ते काम आ. पडळकर यांनी केले. त्यामुळेच ही लढाई प्रस्थापित विरोधी विस्थापित अशी आहे.

आ. पडळकर म्हणाले, हे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल.

जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मोहन रणदिवे, अरुण बालटे, भूमिका बेरगळ, तानाजी यमगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, सुहास पाटील, सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताबाई गायकवाड, दादासाहेब मरगळे, नेताजी पाटील उपस्थित होते.

फोटो - २००७२०२१-विटा-बाणूरगड : बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, प्राजक्ता कोरे, शिवाजी डोंगरे, ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.