शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

आयएमएच्या संपात आयुष डॉक्टरांचा सहभाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशन तथा आयएमएच्या ११ डिसेंबररोजीच्या प्रस्तावित संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशन तथा आयएमएच्या ११ डिसेंबररोजीच्या प्रस्तावित संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत. तसा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला. आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे.

समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकत्र काम करतील, अशी घोषणा समितीच्या बैठकीत करण्यात आली. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११ ) राज्यातील दीड लाखांहून अधिक आयुष डॉक्टर्स गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा देतील. केंद्र शासन व भारतीय चिकित्सा परिषदेच्या अभिनंदनाची पत्रे सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देतील.

समितीचे अध्यक्ष तथा निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयामुळे रुग्णसेवेतील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. शल्य व शालाक्यतंत्र विषयांतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून अधिकाधिक रुग्णांना सेवा मिळेल. यामुळे शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे. आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

टेंभुर्णीकर म्हणाले की, या निर्णयाविरोधात आयएमए निष्कारण संभ्रम निर्माण करत आहे. शासनाच्या निर्णयाने ग्रामीण भागात चांगले शल्यचिकित्सक उपलब्ध होणार आहेत. काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदिक डॉक्टर्स शस्त्रक्रिया करतील. आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्र चिकित्सेला परवानगीविरोधात आयएमएने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण अंतरिम स्थगितीस न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयातही याचिका फेटाळली आहे. या स्थितीत आयएमएने संभ्रम निर्माण करु नयेत.

चौकट

मिक्सोपॅथी, खिचडीफिकेशन नव्हे

आयुष कृती समितीने सांगितले की, आयुर्वेदिक डॉक्टरांचे प्रशिक्षण, गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा आयएमएचा प्रयत्न दुर्दैवी आहे. राजपत्राविषयी ‘मिक्सोपॅथी’, ‘खिचडीफिकेशन’ असा उल्लेख म्हणजे एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल. प्रत्येकवेळी संप, काम बंद आंदोलन, निदर्शने याद्वारे जनतेला वेठीस धरण्याचा आयएमएचा प्रयत्न समाजहितासाठी अनुचित आहे.

--------------------