शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या संपात आयुष डॉक्टरांचा सहभाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशन तथा आयएमएच्या ११ डिसेंबररोजीच्या प्रस्तावित संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशन तथा आयएमएच्या ११ डिसेंबररोजीच्या प्रस्तावित संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत. तसा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला. आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे.

समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकत्र काम करतील, अशी घोषणा समितीच्या बैठकीत करण्यात आली. आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११ ) राज्यातील दीड लाखांहून अधिक आयुष डॉक्टर्स गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा देतील. केंद्र शासन व भारतीय चिकित्सा परिषदेच्या अभिनंदनाची पत्रे सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देतील.

समितीचे अध्यक्ष तथा निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयामुळे रुग्णसेवेतील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. शल्य व शालाक्यतंत्र विषयांतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून अधिकाधिक रुग्णांना सेवा मिळेल. यामुळे शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे. आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

टेंभुर्णीकर म्हणाले की, या निर्णयाविरोधात आयएमए निष्कारण संभ्रम निर्माण करत आहे. शासनाच्या निर्णयाने ग्रामीण भागात चांगले शल्यचिकित्सक उपलब्ध होणार आहेत. काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आयुर्वेदिक डॉक्टर्स शस्त्रक्रिया करतील. आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्र चिकित्सेला परवानगीविरोधात आयएमएने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण अंतरिम स्थगितीस न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयातही याचिका फेटाळली आहे. या स्थितीत आयएमएने संभ्रम निर्माण करु नयेत.

चौकट

मिक्सोपॅथी, खिचडीफिकेशन नव्हे

आयुष कृती समितीने सांगितले की, आयुर्वेदिक डॉक्टरांचे प्रशिक्षण, गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा आयएमएचा प्रयत्न दुर्दैवी आहे. राजपत्राविषयी ‘मिक्सोपॅथी’, ‘खिचडीफिकेशन’ असा उल्लेख म्हणजे एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल. प्रत्येकवेळी संप, काम बंद आंदोलन, निदर्शने याद्वारे जनतेला वेठीस धरण्याचा आयएमएचा प्रयत्न समाजहितासाठी अनुचित आहे.

--------------------