शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

सोशल मीडियाद्वारे होतेय सूर्यनमस्काराचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सध्या आरोग्याची काळजी, व्यायामाची सजगता वाढत आहे. यातून संकल्पही घेतले जात ...

शरद जाधव /

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सध्या आरोग्याची काळजी, व्यायामाची सजगता वाढत आहे. यातून संकल्पही घेतले जात आहेत. मात्र, हे संकल्प तडीस जात नाहीत. या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथील तरुणाईने सूर्यनमस्काराचे महत्त्व ओळखून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबच सूर्यनमस्कार करणाऱ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्यास राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यावेळी निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांमुळे व्यायामाबाबतची सजगता वाढते आहे. त्यातही घरीच थांबून करता येणारे सूर्यनमस्कार करण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याच्याच प्रसारासाठी इस्लामपुरातील तरुण आघाडीवर आहेत.

सध्या सातारा येथे उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राजश्री जाधव-पाटील यांनी यात पुढाकार घेत सूर्यनमस्कार व त्याचे महत्त्व यावर काम सुरू केले आणि त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यांनी स्वत: आतापर्यंत १७ हजार ४८० सूर्यनमस्कार घातले आहेत. इस्लामपूर येथील राजर्षी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. यात डॉ. विक्रांत पाटील, अश्विनी कांबळे, वसंत मदन यांचेही सहकार्य लाभत असते. गेल्यावर्षी जागतिक सूर्यनमस्कार दिनाअगोदर चार महिने सोशल मीडिया व स्थानिक पातळीवरही सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले व त्यादिवशी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

चौकट

असा होतो सोशल मीडियाचा उपयोग...

व्हॉट्‌स ॲप व फेसबुकवर याचे ग्रुप आहेत. रोज सूर्यनमस्कार करणाऱ्यांना त्याची माहिती द्यावी लागते. सूर्यनमस्कार करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मात कशी करायची आणि हळूहळू त्याची संख्या कशी वाढवत जायची, याबाबतचेही मार्गदर्शन केले जाते. फेसबुकवर सध्या या ग्रुपवर ३० हजारहून अधिकजण जोडले गेले आहेत. शाळेत असलेल्या रोल नंबरप्रमाणे याठिकाणीही रोल नंबरप्रमाणे रोजची दैनंदिनी द्यावी लागत असल्याने सूर्यनमस्कारात सातत्य वाढत आहे.

कोट

घरात करता येणारा व त्याचा शरीराला सर्वाधिक उपयोग होणारा व्यायामप्रकार म्हणून सूर्यनमस्काराचे महत्त्व आहे. यात सातत्य ठेवल्यास त्याचा चांगला फायदा जाणवतो. रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीही उपयोग होत असल्याने राज्यभरातून उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

- राजश्री जाधव-पाटील.