शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

सूत उद्योगाला मदतीस टाळाटाळ

By admin | Updated: October 1, 2016 00:19 IST

जयंत पाटील : शासनावर टीका; ‘शेतकरी विणकरी’ची वार्षिक सभा उत्साहात

इस्लामपूर : सुताच्या व्यवसायात विजेचा खर्च मोठा आहे. कापसाचे चढे दर आणि सुताला भाव नाही. त्यातच अवास्तव वीज दर यामुळे राज्यातील वस्त्रोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायाला मदत करण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केला. याचवेळी त्यांनी, या सर्व आव्हानांवर मात करीत शेतकरी विणकरी सूतगिरणी पूर्ण कार्यक्षमतेने सुरु असल्याचे गौरवोद्गारही काढले.राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाच्या कार्यस्थळावर शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची १४ वी वार्षिक सभा झाली, यावेळी ते बोलत होते. सूतगिरणीचे अध्यक्ष बबनराव थोटे अध्यक्षस्थानी होते. संकुलाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील म्हणाले की, सूत व्यवसाय संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. कापूस व सुताच्या दरातील तफावतीमुळे व्यवसाय किफायतशीर राहिलेला नाही. कृत्रिम धाग्याचा वापर करुन तोटा कमी करण्यासाठी सूत निर्मिती सुरु आहे. या व्यवसायातील अनंत अडचणींमुळे जिल्ह्यातील सूतगिरण्यांची अवस्था ‘तीन दिवस बंद—एक दिवस सुरु’ अशी आहे. कापसाचे दर आटोक्यात आले तरच हा व्यवसाय टिकणार आहे. दिलीपराव पाटील म्हणाले, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत सूतगिरणी नावारुपाला आली. कर्ज न काढता, मिळणाऱ्या नफ्यातून सूतगिरणीचा विस्तार केला. दोन वर्षांपूर्वी २५ हजार स्पिंडलचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाची मदत झालेली नाही. कापूस—सूत दरातील वाढती तफावत, विजेचे वाढते दर यामुळे दिवसेंदिवस तोटा वाढतच आहे. अध्यक्ष बबनराव थोटे यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रसाद तगारे यांनी आदरांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मुख्य लेखापाल एच. बी. मुलाणी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सौ. कमल पाटील, रोझा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले.यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, आष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वग्याणी, ज्येष्ठ संचालक बशीर मोमीन, एम. एम. पाटील, उदय शिंदे, विश्वास धस, सुरेखा वाटेगावकर, जगन्नाथ पाटील, रघुनाथ मदने, शशिकांत पाटील, राजेंद्र दिंडे, प्रशांत थोरात, जय महाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष संजय जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, मारुती पेठकर उपस्थित होते. (वार्ताहर)अनुदानाची गरज : दिलीप पाटील यांचा इशाराहा व्यवसाय टिकविण्यासाठी वीज दरातील कपातीसह प्रति स्पिंडल ३ हजार रुपयांचे अनुदान शासनाने द्यावे. शासनाने मदत केली नाही, तर दिवाळीपर्यंत राज्यातील हा व्यवसाय ठप्प होईल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिला.