शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या कर्जदारांचा लिलाव

By admin | Updated: November 18, 2015 00:03 IST

१९ कोटींची वसुली होणार : पाच जामीनदारांनाही बजाविल्या नोटिसा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकित कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ कोटी ८८ लाख ५८ हजार ५२५ रुपयांच्या वसुलीसाठी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी मंगळवारी २० कर्जदारांच्या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेची नोटीस प्रसिद्ध केली आहे. तसेच जामीनदारांच्या मालमत्तांची अपसेट प्राईस (वाजवी किंमत) ठरविण्याचा प्रस्तावही जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक अवसायनात काढण्यात आली आहे. बॅँकेचे एकूण २ हजार ७०० कर्जदार आहेत. यापैकी १०२० कर्जदार गॅस अनुदानातील, तर २०० कर्जदार हे तोडणी वाहतूक करणारे आहेत. उर्वरित १४०० कर्जदारांकडून वसुलीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना नोटिसा बजावणे, मालमत्तांच्या वाजवी किमतीचे प्रस्ताव पाठवून मालमत्ता लिलावात काढणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी २० बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नगरसेवक, बिल्डर्स, व्यापारी, संस्था यांचा समावेश आहे. कर्जदारांबरोबरच पाच जामीनदारांनाही जाहीर समन्स बजावण्यात आले आहे. नोटिसा देऊनही जामीनदार गैरहजर राहिल्याने त्यांच्याही मालमत्तांच्या लिलावासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. या पाचही जामीनदारांच्या मालमत्तांची वाजवी किंमत ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर झाला आहे. यावरील सुनावणी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधकांसमोर होणार आहे. त्यावेळी संबंधित जामीनदारांना लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जामीनदार किंवा कर्जदार पुन्हा गैरहजर राहिले तर, एकतर्फी निकाल दिला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. कर्जदार व जामीनदारांनी लिलावापूर्वी बॅँकेशी कर्जाबाबत संपर्क साधला व रक्कम भरण्याची तयारी दर्शविली तर, त्यांना एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळू शकतो. सध्या बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी ही योजना जाहीर झाली आहे. एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत व्याजात ८ टक्के सवलत दिली जाणार आहे. येत्या ३१ मार्च २०१६ रोजी ही एकरकमी परतफेड योजना बंद होणार असल्याने कर्जदारांसाठी शेवटच्या चार महिन्यांचीच मुदत आहे. सध्याच्या लिलाव प्रक्रियेपूर्वी कर्जदारांनी संपर्क साधला तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा मालमत्तांची विक्री करण्यात येणार आहे. प्रशासकांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कर्जदारांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)बँकेची धडपड : विमा कंपनीला परत केले १३० कोटीएक लाखापर्यंतच्या ठेवीदारांना दिलेल्या विमा संरक्षणाअंतर्गत यापूर्वी विमा कंपनीने १६० कोटी रुपये दिले होते. संरक्षित ठेवीदारांचे पैसे त्यांना परत केले आहेत. बॅँकेतील वसुली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वसुलीतून १३० कोटी रुपये विमा कंपनीला परत केले आहेत. आता कंपनीला ३० कोटी रुपये द्यायचे आहेत. कंपनीचे देणे भागविल्याशिवाय अन्य ठेवीदारांच्या ठेवी परत करणे बॅँकेला शक्य नाही. त्यामुळे सध्या ३० कोटी रुपये परत करण्यासाठी बॅँकेची धडपड सुरू आहे. यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव