शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

‘वसंतदादा’च्या कर्जदारांचा लिलाव

By admin | Updated: November 18, 2015 00:03 IST

१९ कोटींची वसुली होणार : पाच जामीनदारांनाही बजाविल्या नोटिसा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकित कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ कोटी ८८ लाख ५८ हजार ५२५ रुपयांच्या वसुलीसाठी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी मंगळवारी २० कर्जदारांच्या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेची नोटीस प्रसिद्ध केली आहे. तसेच जामीनदारांच्या मालमत्तांची अपसेट प्राईस (वाजवी किंमत) ठरविण्याचा प्रस्तावही जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक अवसायनात काढण्यात आली आहे. बॅँकेचे एकूण २ हजार ७०० कर्जदार आहेत. यापैकी १०२० कर्जदार गॅस अनुदानातील, तर २०० कर्जदार हे तोडणी वाहतूक करणारे आहेत. उर्वरित १४०० कर्जदारांकडून वसुलीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना नोटिसा बजावणे, मालमत्तांच्या वाजवी किमतीचे प्रस्ताव पाठवून मालमत्ता लिलावात काढणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी २० बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नगरसेवक, बिल्डर्स, व्यापारी, संस्था यांचा समावेश आहे. कर्जदारांबरोबरच पाच जामीनदारांनाही जाहीर समन्स बजावण्यात आले आहे. नोटिसा देऊनही जामीनदार गैरहजर राहिल्याने त्यांच्याही मालमत्तांच्या लिलावासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. या पाचही जामीनदारांच्या मालमत्तांची वाजवी किंमत ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर झाला आहे. यावरील सुनावणी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधकांसमोर होणार आहे. त्यावेळी संबंधित जामीनदारांना लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जामीनदार किंवा कर्जदार पुन्हा गैरहजर राहिले तर, एकतर्फी निकाल दिला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. कर्जदार व जामीनदारांनी लिलावापूर्वी बॅँकेशी कर्जाबाबत संपर्क साधला व रक्कम भरण्याची तयारी दर्शविली तर, त्यांना एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळू शकतो. सध्या बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी ही योजना जाहीर झाली आहे. एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत व्याजात ८ टक्के सवलत दिली जाणार आहे. येत्या ३१ मार्च २०१६ रोजी ही एकरकमी परतफेड योजना बंद होणार असल्याने कर्जदारांसाठी शेवटच्या चार महिन्यांचीच मुदत आहे. सध्याच्या लिलाव प्रक्रियेपूर्वी कर्जदारांनी संपर्क साधला तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा मालमत्तांची विक्री करण्यात येणार आहे. प्रशासकांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कर्जदारांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)बँकेची धडपड : विमा कंपनीला परत केले १३० कोटीएक लाखापर्यंतच्या ठेवीदारांना दिलेल्या विमा संरक्षणाअंतर्गत यापूर्वी विमा कंपनीने १६० कोटी रुपये दिले होते. संरक्षित ठेवीदारांचे पैसे त्यांना परत केले आहेत. बॅँकेतील वसुली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वसुलीतून १३० कोटी रुपये विमा कंपनीला परत केले आहेत. आता कंपनीला ३० कोटी रुपये द्यायचे आहेत. कंपनीचे देणे भागविल्याशिवाय अन्य ठेवीदारांच्या ठेवी परत करणे बॅँकेला शक्य नाही. त्यामुळे सध्या ३० कोटी रुपये परत करण्यासाठी बॅँकेची धडपड सुरू आहे. यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव