शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

‘वसंतदादा’च्या कर्जदारांचा लिलाव

By admin | Updated: November 18, 2015 00:03 IST

१९ कोटींची वसुली होणार : पाच जामीनदारांनाही बजाविल्या नोटिसा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकित कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ कोटी ८८ लाख ५८ हजार ५२५ रुपयांच्या वसुलीसाठी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी मंगळवारी २० कर्जदारांच्या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेची नोटीस प्रसिद्ध केली आहे. तसेच जामीनदारांच्या मालमत्तांची अपसेट प्राईस (वाजवी किंमत) ठरविण्याचा प्रस्तावही जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक अवसायनात काढण्यात आली आहे. बॅँकेचे एकूण २ हजार ७०० कर्जदार आहेत. यापैकी १०२० कर्जदार गॅस अनुदानातील, तर २०० कर्जदार हे तोडणी वाहतूक करणारे आहेत. उर्वरित १४०० कर्जदारांकडून वसुलीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना नोटिसा बजावणे, मालमत्तांच्या वाजवी किमतीचे प्रस्ताव पाठवून मालमत्ता लिलावात काढणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी २० बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नगरसेवक, बिल्डर्स, व्यापारी, संस्था यांचा समावेश आहे. कर्जदारांबरोबरच पाच जामीनदारांनाही जाहीर समन्स बजावण्यात आले आहे. नोटिसा देऊनही जामीनदार गैरहजर राहिल्याने त्यांच्याही मालमत्तांच्या लिलावासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. या पाचही जामीनदारांच्या मालमत्तांची वाजवी किंमत ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर झाला आहे. यावरील सुनावणी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधकांसमोर होणार आहे. त्यावेळी संबंधित जामीनदारांना लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जामीनदार किंवा कर्जदार पुन्हा गैरहजर राहिले तर, एकतर्फी निकाल दिला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. कर्जदार व जामीनदारांनी लिलावापूर्वी बॅँकेशी कर्जाबाबत संपर्क साधला व रक्कम भरण्याची तयारी दर्शविली तर, त्यांना एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळू शकतो. सध्या बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी ही योजना जाहीर झाली आहे. एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत व्याजात ८ टक्के सवलत दिली जाणार आहे. येत्या ३१ मार्च २०१६ रोजी ही एकरकमी परतफेड योजना बंद होणार असल्याने कर्जदारांसाठी शेवटच्या चार महिन्यांचीच मुदत आहे. सध्याच्या लिलाव प्रक्रियेपूर्वी कर्जदारांनी संपर्क साधला तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा मालमत्तांची विक्री करण्यात येणार आहे. प्रशासकांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कर्जदारांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)बँकेची धडपड : विमा कंपनीला परत केले १३० कोटीएक लाखापर्यंतच्या ठेवीदारांना दिलेल्या विमा संरक्षणाअंतर्गत यापूर्वी विमा कंपनीने १६० कोटी रुपये दिले होते. संरक्षित ठेवीदारांचे पैसे त्यांना परत केले आहेत. बॅँकेतील वसुली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वसुलीतून १३० कोटी रुपये विमा कंपनीला परत केले आहेत. आता कंपनीला ३० कोटी रुपये द्यायचे आहेत. कंपनीचे देणे भागविल्याशिवाय अन्य ठेवीदारांच्या ठेवी परत करणे बॅँकेला शक्य नाही. त्यामुळे सध्या ३० कोटी रुपये परत करण्यासाठी बॅँकेची धडपड सुरू आहे. यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव